शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

विधान परिषद निवडणूक बिनविरोध, भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 06:48 IST

विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध झाली.

- विशेष प्रतिनिधीमुंबई : विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. या ११ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. तथापि, भाजपाचे पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.रासपाचे उमेदवार आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, भाजपाचे भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि नीलय नाईक, शिवसेनेचे अनिल परब, मनिषा कायंदे, काँग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्रानी आणि शेकापचे जयंत पाटील यांचा बिननिवड झालेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे.विधान परिषदेच्या १६ जुलैला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा व रासपा मिळून सहा उमेदवारी अर्ज दाखल केले होेते. परंतु भाजपाला पाच जागाच निवडायच्या होत्या. त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांनी दाखल केलेला अर्ज भाजपाला मागे घ्यावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्याचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.ही निवडणूक बिनविरोध होत असल्याचा दावा बापट यांनी केला. रासपाचे जानकर यांना भाजपाने पाठिंबा दिल्याने देशमुख यांनी माघार घेतली.विधान परिषदेचे पक्षीयबलाबल आता असे असेलभाजपा २१काँग्रेस १७राष्ट्रवादी काँग्रेस १७शिवसेना १२लोकभारती (जदयु) ०१राष्ट्रीय समाज पक्ष ०१पी. रिपा ०१शेकाप ०१अपक्ष ०६रिक्त ०१एकूण ७८अकरा जागा बिनविरोध निवडण्यात आल्याने ७८ सदस्यांच्या विधान परिषदेत भाजपा-शिवसेनेचे संख्याबळ ३३ झाले आहे.यामुळे संख्याबळाच्या जोरावर भाजपा, शिवसेना, मित्रपक्ष व अपक्ष मिळून पुढील अधिवेशनात ते सभापती व उपसभापती पदावर दावा करूशकतात. सध्या सभापतीव उपसभापती ही पदे अनुक्रमे राष्टÑवादी काँग्रेसव काँग्रेसकडे आहे. 

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक