शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनामध्ये होणारी लूट  थांबविण्यासाठी कायदा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 05:48 IST

सुभाष देसाई; जमिनीचे दर वाढल्यास मूळ मालकाला ५० टक्के रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रकल्पांची घोषणा झाल्यानंतर कमी किमतीत जमीन खरेदी करायची आणि भूसंपादनात त्याच जमिनींसाठी भरघोस नुकसानभरपाई उकळण्याच्या प्रकारांना आता चाप बसणार आहे. त्यासाठी लवकरच राज्याच्या भूसंपादन कायद्यात सुधारणा करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत दिली.एखाद्या प्रकल्पासाठी पहिली अधिसूचना निघाल्यानंतर जमिनीचा व्यवहार झाला असेल आणि नंतर जमिनीचा दर वाढला तर जमिनीच्या एकूण मोबदल्याची ५० टक्के रक्कम जमिनीच्या मूळ मालकाला मिळेल, असे देसाई यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क आणि जेएसडब्ल्यू कंपनीसाठी सरकार सक्तीने भूसंपादन करत असल्याने असंतोष वाढत असल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केला होता. चर्चेला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले की, रायगड जिल्ह्यात औद्योगीकरणासाठी १७ हजार हेक्टर  जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या संमतीने आणि सर्वोच्च मोबदला देऊनच जमीन संपादन केले जाणार आहे. जमिनीचे लगेच वाटप होऊ शकेल, विकली जाईल अशा प्रकल्पांसाठीच भूसंपादन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रॅग पार्कचा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. वेळीच कार्यवाही न झाल्यास हा प्रकल्प अन्य राज्यात जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. एक लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचे देसाई यांनी सांगितले.

होळीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी बैठक होळीच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा वाहतूककोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या जातील. या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाची बैठक घेतली जाईल. महत्त्वाच्या ठिकाणांचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

जि. प. शाळांना सवलतीत वीजजिल्हा परिषदेसह विविध शाळांना व्यावसायिक वीज दराऐवजी उद्योग अथवा तत्सम वर्गाचे दर लागू करण्याबाबत ऊर्जा विभागाला पत्र पाठविले आहे. याबाबतची चाचपणी सुरू असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली.

तूर्तास भारनियमन नाही - नितीन राऊतराज्यात तूर्त तरी भारनियमनाचा मुद्दा नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी  विधान परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना  विजेअभावी पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याबद्दल मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा करण्याचे सरकारचे नियोजन असून त्या दृष्टीने काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वीज देयकांची दुरुस्ती वेळीच झाली पाहिजे यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई