शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 11:40 IST

सातव्या वेतनसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य आहे. 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चुकीचा आहे संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा एसटी व्यवस्थापकीय संचालकांनी दिला आहे. कामगारांचा संप बेकायदेशीर असून काँग्रेसचे छाजेड नावाचे नेते कामगारांची दिशाभूल करत आहेत.  एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकार सहानुभूतीने विचार करीत आहे. मात्र सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य करणे शक्य नाही. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा आयोग लागू करणे शक्य नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी दिला आहे. अशा परस्थित परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा आयोग कसा लागू करणार असा सवाल परिवहन मंत्री रावते यांनी उपस्थित केला.

सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये. प्रवासीच आपले अन्नदाता आहेत. त्यांचा विचार करावा. हा संप कामगारांच्या हिताचा नाही. याने कामगारांचेच नुकसान होणार आहे. प्रवाशांचा विचार करुन संप मागे घ्यावा , असे आवाहन रावते यांनी केले.

कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने संप चुकीचा ठरवला आहे, त्यामुळे संप मागे न घेतल्यास कोर्टाच्या आदोशाप्रमाणे कारवाई होईल अशी माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी  दिली. त्याचप्रमाणे परिवाहनमंत्री दिवाकर रावते यांनीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सातव्या वेतनसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य आहे. 

वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे, बीड यासरख्या शहरातील बस आगारातून एकही एसटी बाहेर पडलेली नाही. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत. दरम्यान, कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे.  कागल बसस्थानकात पुणे-बेळगाव एसटीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. तर बीडमधील अंबेजोगाईत परिवाहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं आहे. 

आज पासून दिवाळीला सुरुवात झाली असून दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे तर जास्तच हाल आहेत. ऐन दिवाळीत संप होणार नाही, रात्रीत काही तोडगा निघेल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. त्यामुळे पहाटे निघणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी काही जण आले होते. मात्र त्यांना रखडत बसावे लागले. इतर वेळी एस टी स्टँडच्या आवारात अनेक खासगी गाड्या प्रवाशांना आवाहन करत असतात. मात्र संपाच्या भीतीमुळे आज खासगी गाड्याही नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

 

टॅग्स :StrikeसंपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसST Strikeएसटी संप