शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 11:40 IST

सातव्या वेतनसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य आहे. 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चुकीचा आहे संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा एसटी व्यवस्थापकीय संचालकांनी दिला आहे. कामगारांचा संप बेकायदेशीर असून काँग्रेसचे छाजेड नावाचे नेते कामगारांची दिशाभूल करत आहेत.  एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकार सहानुभूतीने विचार करीत आहे. मात्र सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य करणे शक्य नाही. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा आयोग लागू करणे शक्य नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी दिला आहे. अशा परस्थित परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा आयोग कसा लागू करणार असा सवाल परिवहन मंत्री रावते यांनी उपस्थित केला.

सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये. प्रवासीच आपले अन्नदाता आहेत. त्यांचा विचार करावा. हा संप कामगारांच्या हिताचा नाही. याने कामगारांचेच नुकसान होणार आहे. प्रवाशांचा विचार करुन संप मागे घ्यावा , असे आवाहन रावते यांनी केले.

कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने संप चुकीचा ठरवला आहे, त्यामुळे संप मागे न घेतल्यास कोर्टाच्या आदोशाप्रमाणे कारवाई होईल अशी माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी  दिली. त्याचप्रमाणे परिवाहनमंत्री दिवाकर रावते यांनीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सातव्या वेतनसाठी सरकारकडे पैसे नाहीत, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य आहे. 

वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे, बीड यासरख्या शहरातील बस आगारातून एकही एसटी बाहेर पडलेली नाही. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत. दरम्यान, कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे.  कागल बसस्थानकात पुणे-बेळगाव एसटीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. तर बीडमधील अंबेजोगाईत परिवाहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं आहे. 

आज पासून दिवाळीला सुरुवात झाली असून दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे तर जास्तच हाल आहेत. ऐन दिवाळीत संप होणार नाही, रात्रीत काही तोडगा निघेल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. त्यामुळे पहाटे निघणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी काही जण आले होते. मात्र त्यांना रखडत बसावे लागले. इतर वेळी एस टी स्टँडच्या आवारात अनेक खासगी गाड्या प्रवाशांना आवाहन करत असतात. मात्र संपाच्या भीतीमुळे आज खासगी गाड्याही नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

 

टॅग्स :StrikeसंपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसST Strikeएसटी संप