शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

भाजप प्रवेश लांबल्याने परतीचे दोर कापणाऱ्या नेत्यांना धाकधूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 15:57 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधीपक्षतील नेते सैरभैर झाले. राष्ट्रवादीतील 20 हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेत जाणे पसंत केले.

मुंबई - विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक विद्यमान आमदारांनी पक्षांतर केले आहे. तर काही नेत्यांनी पक्षांतराची तयारी केली आहे. मात्र अनेक दिवसांपासून पक्षांतराच्या तयारीत असलेल्या नेत्यांना प्रवेशासाठी ग्रीन सिगनल मिळालेले नाही. त्यातच आता आचारसंहिता लागू झाली असून पक्षांतरचं काय, याची चिंता या नेत्यांना सतावत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधीपक्षतील नेते सैरभैर झाले. राष्ट्रवादीतील 20 हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेत जाणे पसंत केले. तर काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार छत्रपती उदनयराजे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून सत्ताधारी भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची एकच गर्दी झाली. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने भाजपकडून काही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला गेला. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि काँग्रेसचे भारत भालके यांच्यासह सिद्धराम म्हेत्रे या विद्यमान आमदारांचा समावेश आहे. या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांना आणि इच्छूकांच्या मुलाखतीला देखील दांडी मारली होती. त्यामुळे आपल्या पक्षात परतणे या नेत्यांसाठी कठिण आहे. तर रामराजे निंबाळकर यांनी वेळीच सावध भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले आहे.

दरम्यान स्वपक्षाचे दोर कापणाऱ्या या नेत्यांना आचारसंहिता लागू झाली तरी भाजप प्रवेशासाठी सिग्नल मिळालेले नाही. तर स्वत:च्या पक्षात परतणेही कठिण झाले आहे. अशा स्थितीत पुढं काय याची धडकी पक्षांतराच्या प्रयत्नात असलेल्या या नेत्यांना भरली आहे.