शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विधानसभेत महाशिवआघाडी; तरी परभणीत राष्ट्रवादीला प्रतीक्षा भाजपची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:20 IST

काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्या राष्ट्रवादीला पुन्हा भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार असून भाजपच्या त्या पाच सदस्यांची राष्ट्रवादीला पुन्हा प्रतीक्षा असणार आहे. 

मुंबई - राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रयोगाची तयारी सुरू असून यामुळे महाशिवआघाडी जन्माला येणार आहे. या आघाडीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळणार आहे. मात्र अनेक जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या अभद्र युत्या यानिमित्ताने पुन्हा समोर येणार आहे. परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सोडतीत खुल्या वर्गातील महिलेला सुटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी दिसत आहे. त्याचेवेळी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकदा भाजपच्या पाच सदस्यांचा पाठिंबा लागणार आहे. 

जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी 54 सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादीकडे केवळ 24 सदस्य आहेत. बहुमतासाठी राष्ट्रवादीला आणखी चार सदस्यांची आवश्यकता आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या पाच सदस्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला होता. त्यावेळी उज्ज्वला राठोड यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी वर्णी लागली होती.

आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जुना कित्ता गिरवत पुन्हा एकदा राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर जिल्ह्यातील काँग्रेससोबत राष्ट्रवादीचे मनोमिलन झाल्यास, राष्ट्रवादीला भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. मात्र काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्या राष्ट्रवादीला पुन्हा भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार असून भाजपच्या त्या पाच सदस्यांची राष्ट्रवादीला पुन्हा प्रतीक्षा असणार आहे.