शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

विधानसभेत महाशिवआघाडी; तरी परभणीत राष्ट्रवादीला प्रतीक्षा भाजपची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:20 IST

काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्या राष्ट्रवादीला पुन्हा भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार असून भाजपच्या त्या पाच सदस्यांची राष्ट्रवादीला पुन्हा प्रतीक्षा असणार आहे. 

मुंबई - राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रयोगाची तयारी सुरू असून यामुळे महाशिवआघाडी जन्माला येणार आहे. या आघाडीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळणार आहे. मात्र अनेक जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या अभद्र युत्या यानिमित्ताने पुन्हा समोर येणार आहे. परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सोडतीत खुल्या वर्गातील महिलेला सुटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी दिसत आहे. त्याचेवेळी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकदा भाजपच्या पाच सदस्यांचा पाठिंबा लागणार आहे. 

जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी 54 सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादीकडे केवळ 24 सदस्य आहेत. बहुमतासाठी राष्ट्रवादीला आणखी चार सदस्यांची आवश्यकता आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या पाच सदस्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला होता. त्यावेळी उज्ज्वला राठोड यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी वर्णी लागली होती.

आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जुना कित्ता गिरवत पुन्हा एकदा राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर जिल्ह्यातील काँग्रेससोबत राष्ट्रवादीचे मनोमिलन झाल्यास, राष्ट्रवादीला भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. मात्र काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्या राष्ट्रवादीला पुन्हा भाजपच्या पाठिंब्याची गरज भासणार असून भाजपच्या त्या पाच सदस्यांची राष्ट्रवादीला पुन्हा प्रतीक्षा असणार आहे.