शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्राचा अभाव!

By admin | Published: June 21, 2016 11:41 PM

कृषी हवामानशास्त्रावर एकाच कृषी विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रम.

राजरत्न सिरसाट/अकोलाशेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामात पेरणीसाठी अचूक माहिती देण्यासाठी कृषी हवामानशास्त्राचा मोठा हातभार लागतो; परंतु राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्रच उपलब्ध नसून, या विषयावरील संशोधनासाठी एकाच कृषी विद्यापीठात कृषी हवामानशास्त्रावर आचार्य पदवी असल्याने या विषयातील तज्ज्ञच तयार होत नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान, अकोल्यात या विषयावर एम.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.हवामान बदलाचा शेतीवर आणि शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या राज्याचा अभ्यास आपल्याकडे असावा, याकरिता प्रथम केरळ व पंजाब कृषी विद्यापीठाने आघाडी घेतली. विशेष म्हणजे, या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या अगोदर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला; परंतु हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.राज्यातील शेतीसमोर हवामानबदलाचे मोठे आव्हान आहे. या बदलांमुळे पावसाचे सरासरी प्रमाण घसरले आहे. कमी दिवसांत जास्त पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस होतो. तापमानात बदल होत आहे. या सर्वांचा परिणाम पिके व उत्पादनावर होत आहे. त्यामुळे कृषिशास्त्रज्ञांपुढे नियोजन करताना मोठय़ा अडचणी निर्माण होत आहेत. यासाठीच स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्र असावे, ही मागणी कृषी विद्यापीठांनी लावून धरली आहे.- कृषी हवामानावर पीएच.डी. प्रगत महाराष्ट्रात एकाही कृषी विद्यापीठाकडे स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्र नाही आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोडले, तर इतर तीन विद्यापीठांमध्ये या विषयावर पीएच.डी. करता येत नाही आणि तेथेही पीएच.डी.ला दोन ते तीन विद्यार्थ्यांचीच प्रवेशक्षमता आहे.