शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण :  एनआयएमार्फत चौकशीचे केंद्र सरकारला अधिकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 04:35 IST

सीबीआय आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एनआयएमार्फत चौकशी करण्याचे पूर्ण अधिकार केंद्र सरकारला आहेत, असा स्पष्ट अभिप्राय राज्याच्या विधि व न्याय विभागाने राज्य सरकारला दिला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.सूत्रांनी सांगितले की, विधि व न्याय विभागाने दिलेल्या अभिप्रायात एनआयएमार्फत चौकशीचा केंद्राने घेतलेला निर्णय कायदे व नियमांच्या चौकटीतच असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता एनआयएमार्फत होणाऱ्या चौकशीबाबत राज्य सरकारची भूमिका काय असावी, यासाठी राज्याच्या महाधिवक्त्यांचे मत शासनाने मागविले आहे.विधि व न्याय विभागाच्या अभिप्रायात म्हटले आहे की, सीबीआय आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्यापैकी सीबीआयला एखाद्या राज्यातील गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर राज्य सरकारची पूर्वसंमती वा शिफारस घ्यावी लागते. एनआयए कायद्यात मात्र राज्याकडून अशी संमती घेण्याची तरतूद नाही. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, एकात्मता बाधित होईल, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास एनआयएच करेल, असे हा कायदा सांगतो.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा