शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election Result: ऐतिहासिक निकाल लागणार! उत्तर कोल्हापूरात ५० वर्षांत कधीच घडलं, ते यंदा घडणार; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 12:57 IST

Kolhapur North By Election Result: काँग्रेसच्या जयश्री जाधवांकडे मोठी आघाडी;

कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक झाली. आज याठिकाणी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेणाऱ्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचं मताधिक्य आता १५ हजारांच्या पुढे गेलं आहे. मतमोजणीच्या २२ व्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपचे सत्यजीत कदम यांनी मतमोजणीच्या काही फेऱ्यांमध्ये अधिक मतं घेतली. आठव्या, नवव्या, दहाव्या फेरीत कदमांना अधिक मतं मिळाली. मात्र त्यानंतरच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये जाधवांनी जास्त मतं घेत आघाडी वाढवत नेली. २२ फेऱ्यांनंतर जाधव यांच्या पारड्यात ८३,३३८ मतं आहेत. तर कदमांना ६७,८१३ मतं मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेस कोल्हापूर उत्तर राखणार हे स्पष्ट झालं आहे.

पहिल्यांदाच महिला आमदार मिळणारउत्तर कोल्हापूर मतदारसंघानं आतापर्यंत ९ आमदार पाहिले. पैकी दोन जण प्रत्येकी दोनदा निवडून आले. मात्र कोल्हापूर उत्तरमधून एकदाही महिला उमेदवार विजयी झालेली नाही. त्यामुळे जयश्री जाधव यांचा विजय ऐतिहासिक असेल. विधानसभेत पहिल्यांदाच उत्तर कोल्हापूरचं प्रतिनिधीत्व महिला करताना दिसेल.कोण किती साली जिंकले१९७२ : त्र्यं. सी. कारखानीस(शेकाप)१९७८ : रवींद्र सबनीस (जनता पक्ष)१९८० : लालासाहेब यादव (काँग्रेस)१९८५ : प्रा. एन. डी. पाटील (शेकाप)१९९० : दिलीप देसाई (शिवसेना)१९९५ : सुरेश साळोखे (शिवसेना)१९९९ : सुरेश साळोखे (शिवसेना)२००४ : मालोजीराजे छत्रपती (काँग्रेस)२००९ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)२०१४ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)२०१९ : चंद्रकांत जाधव (काँग्रेस)

क्षीरसागरांची नाराजी दूर करण्यात यशकोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेला पाचवेळा यश मिळालं आहे. २००९ ते २०१९ या कालावधीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. मात्र २०१९ मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. क्षीरसागर निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र २०१९ मध्ये इथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्यानं या मतदारसंघात काँग्रेसनंच उमेदवार दिला. क्षीरसागर आणि शिवसैनिकांची नाराजी हा कळीचा मुद्दा होता. मात्र जाधव यांना मिळालेली आघाडी पाहता हा विषय निकाली निघाल्याचं दिसत आहे. 

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसBJPभाजपा