शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

अंबाबाई मूर्तीवरचा लेप किती काळ टिकणार...? अहवालानंतर प्रश्नांची जंत्री, विधी नाही तर उपयोग काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 07:49 IST

Kolhapur News: धर्मशास्त्रानुसार मूर्तीचा अभिषेक, स्नान असे धार्मिक विधीच होणार नसतील तर हा लेपनाचा अट्टाहास कशाला, असे अनेक प्रश्न तज्ज्ञांच्या अहवालानंतर पुढे ठाकले आहेत.

 कोल्हापूर -  करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीला गेलेले तडे बुजवल्यानंतर हा लेप किती काळ टिकेल, हे करताना मागच्या वेळी प्रमाणे मूर्तीवरील साडेतीन वेटोळ्यांचा नाग यासह अन्य चिन्हे जाणीवपूर्वक घालवले जाणार नाही कशावरून, जुना लेप उतरविताना मूळ मूर्तीला काही इजा झाली तर तो धोका पत्करायचा का, धर्मशास्त्रानुसार मूर्तीचा अभिषेक, स्नान असे धार्मिक विधीच होणार नसतील तर हा लेपनाचा अट्टाहास कशाला, असे अनेक प्रश्न तज्ज्ञांच्या अहवालानंतर पुढे ठाकले आहेत.

तज्ज्ञांच्या अहवालात मूर्ती भक्कम करण्यासाठी ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे बुजवावेत. मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे अखेरीला रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल, असे म्हटले आहे.

शंभर वर्षे कुठे गेले..?२०१५ पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीचे रासायनिक संवर्धन केल्यानंतर हे संवर्धन पुढील शंभर वर्षे टिकेल, असा दावा केला होता. पण सात वर्षे देखील हा लेप व्यवस्थित टिकला नाही. यासाठी वापरले गेलेले साहित्यदेखील मूळ मूर्तीच्या दगडाला जुळवून न घेणारे, निकृष्ट दर्जाचे होते, असे अहवालात नमूद आहे.

पुढे काय..?या अहवालावर २३ तारखेला सुनावणी होणार आहे. यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पुरातत्त्व खाते, वादी, प्रतिवादी आपले म्हणणे सादर करणार आहेत. त्यावर चर्चा होऊन न्यायालय मूर्ती संदर्भात निर्णय देईल. 

मूर्तीला सध्या दोन वेळा स्पंजिंग केले जाते, ते आता एकदाच करायला सांगितले आहे. स्नान तर सोडूनच द्या, किरीट सांभाळून घाला, फुलं घालू नका. जे काही सोपस्कार असतील ते उत्सव मूर्तीवर करायचे आहेत. धर्मशास्त्रानुसार मूर्तीवर काहीच करता येत नसेल तर उपयोग काय? त्यामुळे मी मूर्ती बदलाची मागणी करणार आहे.-ॲड. प्रसन्न मालेकर, मूर्ती व मंदिर अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र