शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

अंबाबाई मूर्तीवरचा लेप किती काळ टिकणार...? अहवालानंतर प्रश्नांची जंत्री, विधी नाही तर उपयोग काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 07:49 IST

Kolhapur News: धर्मशास्त्रानुसार मूर्तीचा अभिषेक, स्नान असे धार्मिक विधीच होणार नसतील तर हा लेपनाचा अट्टाहास कशाला, असे अनेक प्रश्न तज्ज्ञांच्या अहवालानंतर पुढे ठाकले आहेत.

 कोल्हापूर -  करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीला गेलेले तडे बुजवल्यानंतर हा लेप किती काळ टिकेल, हे करताना मागच्या वेळी प्रमाणे मूर्तीवरील साडेतीन वेटोळ्यांचा नाग यासह अन्य चिन्हे जाणीवपूर्वक घालवले जाणार नाही कशावरून, जुना लेप उतरविताना मूळ मूर्तीला काही इजा झाली तर तो धोका पत्करायचा का, धर्मशास्त्रानुसार मूर्तीचा अभिषेक, स्नान असे धार्मिक विधीच होणार नसतील तर हा लेपनाचा अट्टाहास कशाला, असे अनेक प्रश्न तज्ज्ञांच्या अहवालानंतर पुढे ठाकले आहेत.

तज्ज्ञांच्या अहवालात मूर्ती भक्कम करण्यासाठी ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे बुजवावेत. मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे अखेरीला रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल, असे म्हटले आहे.

शंभर वर्षे कुठे गेले..?२०१५ पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीचे रासायनिक संवर्धन केल्यानंतर हे संवर्धन पुढील शंभर वर्षे टिकेल, असा दावा केला होता. पण सात वर्षे देखील हा लेप व्यवस्थित टिकला नाही. यासाठी वापरले गेलेले साहित्यदेखील मूळ मूर्तीच्या दगडाला जुळवून न घेणारे, निकृष्ट दर्जाचे होते, असे अहवालात नमूद आहे.

पुढे काय..?या अहवालावर २३ तारखेला सुनावणी होणार आहे. यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पुरातत्त्व खाते, वादी, प्रतिवादी आपले म्हणणे सादर करणार आहेत. त्यावर चर्चा होऊन न्यायालय मूर्ती संदर्भात निर्णय देईल. 

मूर्तीला सध्या दोन वेळा स्पंजिंग केले जाते, ते आता एकदाच करायला सांगितले आहे. स्नान तर सोडूनच द्या, किरीट सांभाळून घाला, फुलं घालू नका. जे काही सोपस्कार असतील ते उत्सव मूर्तीवर करायचे आहेत. धर्मशास्त्रानुसार मूर्तीवर काहीच करता येत नसेल तर उपयोग काय? त्यामुळे मी मूर्ती बदलाची मागणी करणार आहे.-ॲड. प्रसन्न मालेकर, मूर्ती व मंदिर अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र