शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

किसान मोर्चाला मुंबईकरांचीही साथ, ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:32 IST

अखिल भारतीय किसान सभेतर्फे ६ मार्चपासून काढण्यात आलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी, संघटनांनी, संस्थांनी, सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था केली असल्याचे पाहायला मिळाले.

- अक्षय चोरगेमुंबई - अखिल भारतीय किसान सभेतर्फे ६ मार्चपासून काढण्यात आलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी, संघटनांनी, संस्थांनी, सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था केली असल्याचे पाहायला मिळाले. सहा दिवस अहोरात्र उन्हात चालूनदेखील शेतकरी प्रचंड उत्साही दिसले. १२ मार्च रोजी आंदोलक विधान भवनाला बेमुदत घेराव घालणार आहेत.मोर्चाला मदत करणाºया विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही जरी मुंबईसारख्या शहरात राहत असलो, तरी आमचे वडील, काका, आजोबा, मामा गावाकडे शेती करतात. मुंबईत मिळणारा भाजीपाला, धान्य, कडधान्यांपासून ते साखर, तेलापर्यंत सर्व वस्तू शेतकºयांच्या कष्टामुळे आपल्याला मिळतात. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकºयांमध्ये बहुतांश शेतकरी हे वयोवृद्ध आहेत.सहा दिवस अहोरात्र, उपाशीपोटी, अर्धपोटी चालत असूनही शेतकरी उत्साही दिसले. बहुसंख्य शेतकरी विविध वाद्ये वाजविताना, वाद्यांच्या तालावर नृत्य करताना पाहायला मिळाले, तर अनेकांनी सोबत स्पीकर्स ठेवले होते. काही वेळ शांतपणे मोर्चा पुढे सरकल्यानंतर, कोणीतरी मध्येच ‘लाल बावटा... झिंदाबाद’ अशी घोषणा देऊन वातावरण पुन्हा उत्साही करण्याचा प्रयत्न करत होते.आंदोलकांनी संबळ, पिपाणी, ढोलकी, बासरी आणली होती. वाद्यांच्या तालावर शेतकरी ‘कहाळी’ या आदिवासी नृत्यप्रकारावर आधारित नृत्याचे सादरीकरण करत होते. स्त्रिया पारंपरिक गाणी म्हणत होत्या.संत बाबा ठाकरसिंगजी कास सेवा विक्रोळी (विक्रोळी गुरुद्वारा) तर्फे आंदोलकांसाठी नाश्ता, पाणी आणि अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दी बॉम्बे कॅथलिस सभेतर्फे विक्रोळी येथे आंदोलकांसाठी पाणी आणि बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती.आंदोलनकर्त्यांना मोबाइल चार्ज करण्यासाठी कोठेही वीज उपलब्ध नाही. उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी लक्ष्मण भसरे यांनी ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले आहे. हे पॅनेल डोक्यावर अडकवून दिवसभर सहकाºयांचे मोबाइल, टॉर्च चार्ज करून देत आहे. भसरे यांनी सांगितले की, अजूनही तीन-चार शेतकºयांनी असा ‘जुगाड’ केला आहे. पॅनेल डोक्यावर असल्याने उन्हाचा त्रास होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र