शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

किसान मोर्चाला मुंबईकरांचीही साथ, ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:32 IST

अखिल भारतीय किसान सभेतर्फे ६ मार्चपासून काढण्यात आलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी, संघटनांनी, संस्थांनी, सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था केली असल्याचे पाहायला मिळाले.

- अक्षय चोरगेमुंबई - अखिल भारतीय किसान सभेतर्फे ६ मार्चपासून काढण्यात आलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी, संघटनांनी, संस्थांनी, सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था केली असल्याचे पाहायला मिळाले. सहा दिवस अहोरात्र उन्हात चालूनदेखील शेतकरी प्रचंड उत्साही दिसले. १२ मार्च रोजी आंदोलक विधान भवनाला बेमुदत घेराव घालणार आहेत.मोर्चाला मदत करणाºया विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही जरी मुंबईसारख्या शहरात राहत असलो, तरी आमचे वडील, काका, आजोबा, मामा गावाकडे शेती करतात. मुंबईत मिळणारा भाजीपाला, धान्य, कडधान्यांपासून ते साखर, तेलापर्यंत सर्व वस्तू शेतकºयांच्या कष्टामुळे आपल्याला मिळतात. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकºयांमध्ये बहुतांश शेतकरी हे वयोवृद्ध आहेत.सहा दिवस अहोरात्र, उपाशीपोटी, अर्धपोटी चालत असूनही शेतकरी उत्साही दिसले. बहुसंख्य शेतकरी विविध वाद्ये वाजविताना, वाद्यांच्या तालावर नृत्य करताना पाहायला मिळाले, तर अनेकांनी सोबत स्पीकर्स ठेवले होते. काही वेळ शांतपणे मोर्चा पुढे सरकल्यानंतर, कोणीतरी मध्येच ‘लाल बावटा... झिंदाबाद’ अशी घोषणा देऊन वातावरण पुन्हा उत्साही करण्याचा प्रयत्न करत होते.आंदोलकांनी संबळ, पिपाणी, ढोलकी, बासरी आणली होती. वाद्यांच्या तालावर शेतकरी ‘कहाळी’ या आदिवासी नृत्यप्रकारावर आधारित नृत्याचे सादरीकरण करत होते. स्त्रिया पारंपरिक गाणी म्हणत होत्या.संत बाबा ठाकरसिंगजी कास सेवा विक्रोळी (विक्रोळी गुरुद्वारा) तर्फे आंदोलकांसाठी नाश्ता, पाणी आणि अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दी बॉम्बे कॅथलिस सभेतर्फे विक्रोळी येथे आंदोलकांसाठी पाणी आणि बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती.आंदोलनकर्त्यांना मोबाइल चार्ज करण्यासाठी कोठेही वीज उपलब्ध नाही. उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी लक्ष्मण भसरे यांनी ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले आहे. हे पॅनेल डोक्यावर अडकवून दिवसभर सहकाºयांचे मोबाइल, टॉर्च चार्ज करून देत आहे. भसरे यांनी सांगितले की, अजूनही तीन-चार शेतकºयांनी असा ‘जुगाड’ केला आहे. पॅनेल डोक्यावर असल्याने उन्हाचा त्रास होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र