शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:12 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल होण्यावरून राजकारण सुरू झालं असून, ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी काय तो इशारा समजून जावा, असं विधान केलं आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू असतानच किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडालेली आहे. त्यात आता किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल होण्यावरून राजकारण सुरू झालं असून, ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी काय तो इशारा समजून जावा, असं विधान केलं आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र किरण सामंत यांचे बंधू आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी मात्र किरण सामंत हे ग्रामीण भागात असून, तिकडे रेंज नसल्याने त्यांच्या फोन लागत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही समावेश आहे. येथे नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. दरम्यान, आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याचं वृत्त धडकताच महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्या निवडणुकीला नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय उभे असतात ती निवडणूक दहशत, दादागिरी आणि धाकदपटशाही करणारी असते. किरण सामंत हे कुठल्यागी दादागिरीला, धमकीला भीक घालणारे नाही आहेत. ते लढवय्ये आहेत. ज्याअर्थी ते गप्प बसले आहेत. त्याअर्थी त्यांचे मतदार आणि कार्यकर्त्यांनी इशारा समजून घेतला पाहिजे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

तर याबाबत प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले की, किरण सामंत हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. आज आम्ही पोलीस महासंचालकांना  पत्र देऊन किरण सामंत यांना निवडणुकीनंतर ताबडतोब संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी  केली आहे. या आधी या मतदारसंघात दहशतवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मतदान शांततेत झाल्यानंतरसुद्धा काही होऊ नये, यासाठी पोलिसांनी किरण सामंत यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण द्यावं, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या सर्व घटनाक्रमावर उदय सामंत यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. किरण सामंत हे ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे त्यांचा फोन लागत नाही आहे. असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गMahayutiमहायुतीVinayak Rautविनायक राऊत Vaibhav Naikवैभव नाईक lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४