शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:12 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल होण्यावरून राजकारण सुरू झालं असून, ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी काय तो इशारा समजून जावा, असं विधान केलं आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू असतानच किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडालेली आहे. त्यात आता किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल होण्यावरून राजकारण सुरू झालं असून, ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी काय तो इशारा समजून जावा, असं विधान केलं आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र किरण सामंत यांचे बंधू आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी मात्र किरण सामंत हे ग्रामीण भागात असून, तिकडे रेंज नसल्याने त्यांच्या फोन लागत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही समावेश आहे. येथे नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. दरम्यान, आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याचं वृत्त धडकताच महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्या निवडणुकीला नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय उभे असतात ती निवडणूक दहशत, दादागिरी आणि धाकदपटशाही करणारी असते. किरण सामंत हे कुठल्यागी दादागिरीला, धमकीला भीक घालणारे नाही आहेत. ते लढवय्ये आहेत. ज्याअर्थी ते गप्प बसले आहेत. त्याअर्थी त्यांचे मतदार आणि कार्यकर्त्यांनी इशारा समजून घेतला पाहिजे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

तर याबाबत प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले की, किरण सामंत हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. आज आम्ही पोलीस महासंचालकांना  पत्र देऊन किरण सामंत यांना निवडणुकीनंतर ताबडतोब संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी  केली आहे. या आधी या मतदारसंघात दहशतवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मतदान शांततेत झाल्यानंतरसुद्धा काही होऊ नये, यासाठी पोलिसांनी किरण सामंत यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण द्यावं, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या सर्व घटनाक्रमावर उदय सामंत यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. किरण सामंत हे ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे त्यांचा फोन लागत नाही आहे. असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गMahayutiमहायुतीVinayak Rautविनायक राऊत Vaibhav Naikवैभव नाईक lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४