शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

पावसामुळे निवड चाचणी स्पर्धेला ‘खो’

By admin | Published: September 25, 2016 12:40 AM

सांगली येथे होणाऱ्या (६ ते ९ आॅक्टोबर) खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे संघ पाठवण्यात येणार आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे निवड चाचणी स्पर्धा रद्द करण्याची नामुश्की

मुंबई : सांगली येथे होणाऱ्या (६ ते ९ आॅक्टोबर) खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे संघ पाठवण्यात येणार आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे निवड चाचणी स्पर्धा रद्द करण्याची नामुश्की ठाणे खो-खो संघटनेवर ओढवली. परिणामी, संघटनेने २५ आॅक्टोबर रोजी नवी मुंबई, ऐरोली सेक्टर १६ येथील राधिकाबाई मेघे विद्यालय, विहंग क्रीडा मंडळात सकाळी ९ वाजता जिल्हा संघाची निवड चाचणी आयोजित केली आहे, अशी माहिती दिली.ठाणे जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा आणि खो-खो निवड चाचणी स्पर्धा यांमधून जिल्हा संघाची निवड करण्यात येते. मात्र सतत पडणाऱ्या पावासामुळे खो-खो स्पर्धांचे आयोजन शक्य नसल्याचे संघटनेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. पावसात स्पर्धा घेतल्यास खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवड चाचणी स्पर्धा घेणे अशक्य असल्याचे संघटनचे म्हणणे आहे. याचा फटका अहमदनगर येथे होणाऱ्या कुमार-कुमारी (१८ वर्षांखालील) खो-खो स्पर्धेलाही बसला आहे. परिणामी, पुरुष-महिला आणि कुमार-कुमारी या निवड चाचणी ऐरोली येथील विहंग क्रीडा मंडळात पार पडणार असल्याने पावसामुळे चक्क निवड चाचणी स्पर्धेलाच ‘खो’ मिळाल्याचे दिसून आले. ठाणे संघ निवडण्यासाठी मागील वर्षीच्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणीत सहभागी खेळाडूंचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली. (क्रीडा प्रतिनिधी)