शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

राज्याचे निम्मे खरीप क्षेत्र गेले वाया; साडेसहा ते साडेसात हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 06:46 IST

पुरेसा पाऊस पेरणी न झाल्याने खरीप हंगामातील निम्म्याहून अधिक क्षेत्र बाधित होणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

- विशाल शिर्के पुणे : पुरेसा पाऊस पेरणी न झाल्याने खरीप हंगामातील निम्म्याहून अधिक क्षेत्र बाधित होणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बळीराजाचे त्यामुळे तब्बल साडेसहा ते साडेसात हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला. मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर जिल्ह्याला याची सर्वाधिक झळ बसणार आहे.जून, जुलै आणि आॅगस्टच्या मध्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दीर्घ ओढ दिली. सप्टेंबर महिन्यात तर जवळपास पाऊस झालाच नसल्याचे चित्र राज्यात विविध ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे सिंचन सुविधा असलेला भाग वगळता इतरत्र पिकाच्या उत्पादकतेत मोठी घट दिसून येत आहे.राज्यात ऊस पीक वगळून १४० आणि ऊस पिकासह क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र आहेत. त्या पैकी ऊस पिक वगळून १३९.३८ आणि ऊस पिकासह १४१.२९ लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवड झाली आहे. त्यातील ऊस वगळून ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याचा अंदाज आहे. त्यात कापूस, उशिरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसाच्या तिसऱ्या वेचणीला अधिक फटका बसणार आहे. यंदा सोयाबीनची ४०.४४ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यातील ३२ ते ३३ लाख हेक्टर क्षेत्र काही ना काही प्रमाणात प्रभावीत झाले आहे. कापसाचे ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून, अंदाजे २० लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर, तूरीचे १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ८ ते ९ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज आहे.१५ जिल्ह्यांत आॅक्टोबर कोरडा लोकमत न्यूज नेटवर्कराज्यात जवळपास सर्व ठिकाणी परतीचा पाऊस झालाच नाही़ विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात आॅक्टोबर महिना संपूर्णपणे कोरडा गेला तर ९ जिल्ह्यांत केवळ तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ परतीच्या पावसाने दगा दिल्याने राज्यात सर्वत्र पाणीटंचाईनिर्माण झाली असून रब्बीच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला ओलावा जमिनीत नसल्याने अनेक ठिकाणी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात अनेकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो व त्याचा फायदा मराठवाडा, सोलापूर, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना होत असतो़ या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन त्याचा फायदा रब्बीच्या पिकांना होतो. पण यंदा सप्टेंबरमध्ये केवळ एकदाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला़ पण तो ईशान्य भारताकडे गेल्याने मध्य भारत, महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला नाही़ यंदा परतीचा पाऊस होण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने आधीच व्यक्त केला होता.बंगालच्या उपसागरात आॅक्टोबरमध्ये मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो, तेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते़ त्याचा फायदा मध्य भारताला होत असतो़ पण यंदा बंगालच्या उपसागरात असे कमी दाबाचे क्षेत्रच तयार झाले नाही़ त्याचा फटका बसला आहे़ हवामान विभागाने याचा अंदाज अगोदरच व्यक्त केला होता़- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानशास्त्रज्ञमराठवाड्यासह राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांत पावसाळ्याच्या चार महिन्यांतच सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला होता़ त्यात आॅक्टोबरमध्ये हमखास पडणाºया परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई झाली असून अनेक ठिकाणी रब्बीच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे.नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नंदूरबार, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी या १५ जिल्ह्यांत आॅक्टोबर महिना कोरडा ठणठणीत गेला़ याशिवाय पालघर ९१ टक्के, ठाणे ९२ टक्के, मुंबई उपनगर ९५ टक्के, अहमदनगर ९४ टक्के, औरंगाबाद ९७ टक्के, जालना ९८ टक्के, बीड ९२ टक्के, गोंदिया ९९ टक्के, धुळे ९९ टक्के या जिल्ह्यांत अतिशय किरकोळ पाऊस झाला.या शिवाय बाकी जिल्ह्यांमध्येही थोडा फार पाऊस झाला असला तरी कोणत्याही जिल्ह्यामध्ये आॅक्टोबरमध्ये पडणाºया पावसाच्या सरासरी इतका पाऊस कोठेही झाला नाही़ त्याचा परिणाम संपूर्ण राज्यातील पाणीसाठ्यावर झाला असून आगामी रब्बी हंगामावर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र