विकास हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा
By Admin | Updated: September 3, 2014 03:01 IST2014-09-03T03:01:06+5:302014-09-03T03:01:06+5:30
गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे हाच आगामी निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल,

विकास हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा
कणकवली : उद्योग, शिक्षण, आय.टी, शेती अशा सर्वच क्षेत्रत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस आघाडी शासनाने केलेली विकासकामे हाच आगामी निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असेल, अशी माहिती काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणो यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
पालकमंत्री नारायण राणो दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ:यावर मंगळवारपासून दाखल झाले. यावेळी त्यांनी कणकवली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभेतील काँग्रेसच्या प्रचार यंत्रणोबाबत माहिती दिली. मुंबईमध्ये सोमवारी प्रचाराचा प्रारंभ झाला असून, यापुढे पुणो, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या महानगरांमध्ये आणि ग्रामीण भागात प्रचारसभा होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या पंधरा वर्षात केलेली विकासकामे, प्रगती, दुष्काळी परिस्थितीत आठ ते नऊ हजार कोटी रुपयांची मदत हे प्रमुख मुद्दे असतील, असे ते म्हणाले. विरोधकांकडे राज्यकारभार चालविण्याची क्षमता असलेली व्यक्तीच नाही. हे राज्य कायमच प्रगतीमध्ये अव्वल ठेवण्याचे काम काँग्रेसच करू शकते, असा विश्वास राणो यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करूनच लढतील
दोन्ही काँग्रेसनी 288 मतदारसंघांत आपापल्या कार्यकत्र्याकडून अर्ज मागितले असले, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करूनच निवडणुकीला सामोरे जातील. जागावाटपाबाबत बोलणी सुरू आहे. काही जागांची अदलाबदलदेखील होईल, असे राणो यांनी स्पष्ट केले.
खासदार अज्ञानी
खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना राणो म्हणाले, विनायक राऊत अज्ञानी खासदार आहेत. ‘सी वर्ल्ड’बाबत काही लोकांना घेऊन विरोध करीत असतील तर प्रथम ‘जैतापूर’चे काय झाले ते पाहा. शिवसेनेने ‘जैतापूर’ला विरोध केला आणि मोदींनी मुंबईत जैतापूर झाला पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यामुळे राऊत यांनी ‘सी वर्ल्ड’ होऊ देणार नाही अशी भूमिका घेताना आपली ताकद तपासावी, असा सल्ला राणोंनी दिला.