शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

विधानसभेला अडीच कोटी मतांचे लक्ष्य ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:19 IST

मुख्यमंत्री : भाजप कार्यकर्त्यांना केले आवाहन

मुंबई : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून साडेपाच कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्याच्या पन्नास टक्के म्हणजे अडीच कोटी मते मिळविण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.भाजपच्या सदस्यता अभियानाचा प्रारंभ मुंबईत झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील एक कोटी घरांत पक्षाचे सदस्य झाले पाहिजेत. भाजपच्या या पन्नास टक्के मतांच्या फॉर्मुल्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीचे काय होणार, याची काळजी कोणीही करण्याचे कारण नाही. जिथे आपल्याला गरज लागेल तिथे आपल्या भरवशावर आणि जिथे मित्राला गरज लागेल तिथे मित्रासाठी आपण काम करू, असेही ते म्हणाले.

मुंबईत पन्नास लाख मतदार आहेत. मुंबईत भाजपचे तीस लाख सदस्य झाले पाहिजेत. देशाची अर्थव्यवस्था विस्तारल्यानंतर तरूणाईला मोठ्या प्रमाणात नोकऱ्या व रोजगाराची संधी मिळणार आहे. पुढील पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासात १०० लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या विकासात महाराष्ट्र देखील मागे राहणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.अर्थसंकल्पातून हा देश विकासाच्या कोणत्या वाटेवर जाणार आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची आहे. मात्र ही अर्थव्यवस्था विस्तारत असताना देशातील शेवटच्या घटकाला देखील त्याच्या विकासाचा भाग बनवायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री विद्या ठाकूर, योगेश सागर, माजी मंत्री प्रकाश मेहता, संघटनमंत्री सुनील कर्जतकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस