शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

Karnataka Maharashtra, Eknath Shinde: बोम्मई बेताल बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मौन का?- राष्ट्रवादीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 19:50 IST

"बोम्मईंना त्यांच्या अटींवर हुकूमशाही करण्याची परवानगी दिली जाऊ नये"

NCP vs Eknath Shinde, Karnataka - Maharashtra Disputes: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले होते. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. यावर, महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आता सीमेवरील मतभेद पाहता परिस्थिती अनुकूल नाही असं सांगून, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे सांगितले जात आहे. यावरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) म्हणाले, "कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेबाबत केलेल्या बेताल वक्तव्यावर आणि उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकार, भाजप आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मौन का बाळगून आहेत? सर्वप्रथम त्यांनी न्यायालयाधीन सीमा मुद्द्यांवर विधाने केली, ज्यामुळे दोन्ही राज्यांतील शांतता बिघडली. आता सीमेवरील मतभेद पाहता परिस्थिती अनुकूल नाही असं सांगून, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. बोम्मई यांच्या बेताल विधानांमुळे मतभेद पुन्हा वाढले आहेत."

"मंत्री या वादावर कायदेतज्ज्ञ आणि इतर लोकांशी संपर्क साधणार होते. सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चेने मदत होऊ शकते, मग कर्नाटकचे मुख्यमंत्री संवादासाठी तयार का नाहीत? बोम्मई यांना त्यांच्या अटींवर हुकूमशाही करण्याची परवानगी दिली जाऊ नये. म्हणून केंद्राने हस्तक्षेप करून त्यांना रोखणे आणि दोन्ही राज्यांमध्ये शांतता राखणे आवश्यक आहे. आता हा प्रश्न की, बोम्मई बेताल बोलत असताना केंद्र, भाजप आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी का मौन धारण केले आहे? याचे उत्तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जनतेला केंद्र सरकार, भाजप आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देणे आवश्यक आहे," असा सवालही क्लाईड क्रास्टो यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस