शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

"शिंदे-फडणवीस सरकार बोम्मईंच्या दबावापुढे का झुकतंय?", राष्ट्रवादीचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 19:27 IST

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावरून केलं राज्य सरकारला लक्ष्य

Karnataka Maharashtra Border Disputes: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले होते. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. यावर, महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आता सीमेवरील मतभेद पाहता परिस्थिती अनुकूल नाही असं सांगून, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे सांगितल्याचे म्हटले होते. तशातच आता मंत्र्यांचा कर्नाटक दौराही रद्द झाल्या. त्यावरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सवाल उपस्थित केला.

"शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दबावाला बळी पडताना पाहून आश्चर्य वाटते. बातम्यांनुसार स्पष्टपणे कळत आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा वादावरील न्यायालयीन खटल्याबाबत कायदेतज्ज्ञांशी भेटण्यासाठी आणि लोकांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाणार होते. परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमेवरील अशांततेची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना येऊ नका, असे सांगितले. पण अशी अशांततेची परिस्थिती त्यांच्याच वक्तव्यामुळे निर्माण झाली आहे. आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे मंत्री फक्त महापरिनिर्वाण दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त बेळगावला जाणार होते. परंतु मंत्री त्या दिवशी तिथे गेले तर अशांतता निर्माण होऊ शकते म्हणून ही भेट आता रद्द केली आहे. हा यू टर्न का? त्यांच्या सरकारला त्या दिवसाचे महत्त्व माहिती नव्हते का? भेटीची घोषणा करण्यापूर्वी त्यांना शांतता भंग होऊ शकते याची जाणीव नव्हती का?" असे सवाल क्लाईड क्रास्टो यांनी उपस्थित केले.

----

"सत्य हे आहे की, बोम्मई यांच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्र सरकार त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागत आहे. एका भाजपच्या मुख्यमंत्र्याला दुसऱ्या भाजप पुरस्कृत राज्यात भाजप मनमानी करू देत आहे आणि केंद्र सरकार व भाजप मूक प्रेक्षक बनून बघत आहेत ही लज्जास्पद बाब आहे. भाजपच्या या विचित्र वागण्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे की... जसे दिसत आहे त्यापेक्षा काही अधिक असण्याची शक्यता तर नाही ना?" अशी खोचत टीकादेखील क्लाईड क्रास्टो यांनी केली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकborder disputeसीमा वादNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा