शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

"शिंदे-फडणवीस सरकार बोम्मईंच्या दबावापुढे का झुकतंय?", राष्ट्रवादीचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 19:27 IST

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावरून केलं राज्य सरकारला लक्ष्य

Karnataka Maharashtra Border Disputes: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले होते. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. यावर, महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही ही जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर आता सीमेवरील मतभेद पाहता परिस्थिती अनुकूल नाही असं सांगून, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे सांगितल्याचे म्हटले होते. तशातच आता मंत्र्यांचा कर्नाटक दौराही रद्द झाल्या. त्यावरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सवाल उपस्थित केला.

"शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दबावाला बळी पडताना पाहून आश्चर्य वाटते. बातम्यांनुसार स्पष्टपणे कळत आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा वादावरील न्यायालयीन खटल्याबाबत कायदेतज्ज्ञांशी भेटण्यासाठी आणि लोकांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाणार होते. परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमेवरील अशांततेची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना येऊ नका, असे सांगितले. पण अशी अशांततेची परिस्थिती त्यांच्याच वक्तव्यामुळे निर्माण झाली आहे. आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे मंत्री फक्त महापरिनिर्वाण दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त बेळगावला जाणार होते. परंतु मंत्री त्या दिवशी तिथे गेले तर अशांतता निर्माण होऊ शकते म्हणून ही भेट आता रद्द केली आहे. हा यू टर्न का? त्यांच्या सरकारला त्या दिवसाचे महत्त्व माहिती नव्हते का? भेटीची घोषणा करण्यापूर्वी त्यांना शांतता भंग होऊ शकते याची जाणीव नव्हती का?" असे सवाल क्लाईड क्रास्टो यांनी उपस्थित केले.

----

"सत्य हे आहे की, बोम्मई यांच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्र सरकार त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागत आहे. एका भाजपच्या मुख्यमंत्र्याला दुसऱ्या भाजप पुरस्कृत राज्यात भाजप मनमानी करू देत आहे आणि केंद्र सरकार व भाजप मूक प्रेक्षक बनून बघत आहेत ही लज्जास्पद बाब आहे. भाजपच्या या विचित्र वागण्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे की... जसे दिसत आहे त्यापेक्षा काही अधिक असण्याची शक्यता तर नाही ना?" अशी खोचत टीकादेखील क्लाईड क्रास्टो यांनी केली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकborder disputeसीमा वादNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा