शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...आणि बाळासाहेब ठाकरेंना अटक ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:36 IST

हे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने सुरू झाली. परप्रांतीयांची हॉटेल्स, दुकाने, तसेच अन्यत्रही दगडफेक सुरू झाली. तिथेही लाठीमार झाला. गोळीबार करण्यात आला. तब्बल ८ दिवस मुंबईत जाळपोळ सुरू राहिली.

संजीव साबडे -

शिवसेनेची १९६६ साली स्थापना झाली, तीच मुळी महाराष्ट्रात मराठी भाषकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरही सरकारी व बँकांतील नोकऱ्यांत परप्रांतीयांना प्राधान्य मिळत असल्याने मराठी भाषकांमध्ये संताप होता. शिवाय मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला असला तरी कर्नाटकात गेलेला मराठी भाषक भाग पुन्हा मिळावा, ही मराठी जनतेची आणि शिवसेनेची प्रमुख मागणी होती. सीमा प्रश्न खदखदत होता. सीमा प्रश्न सुटेपर्यंत केंद्रातील एकाही मंत्र्याला मुंबई व महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर १९६८ साली परळच्या कामगार मैदानावरून दिला होता; पण शिवसेना हे प्रत्यक्ष करेल, असे कोणाला वाटत नव्हते.  मोरारजी देसाई तेव्हा उपपंतप्रधान होते. त्यांचा मुंबई दौरा जाहीर झाला. मुळात मोरारजीभाईंबद्दल मराठी लोकांत राग होता. ते मराठीद्वेष्टे आहेत, महाराष्ट्राविषयी त्यांच्या मनात अढी आहे, असे सर्वांना वाटत होते. ते ८ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर पोहोचले. तेथून कारने दक्षिण मुंबईत येत असताना माहीम चर्चपाशी शिवसैनिकांनी त्यांची कार अडवली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला, त्यात अनेक शिवसैनिक जखमी झाले;  पण त्यामुळे वातावरण खूपच तापले. पोलिसांनी बाळासाहेब ठाकरे, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी आदींना अटक केली. ठाकरे यांना झालेली ही पहिली अटक.  हे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने सुरू झाली. परप्रांतीयांची हॉटेल्स, दुकाने, तसेच अन्यत्रही दगडफेक सुरू झाली. तिथेही लाठीमार झाला. गोळीबार करण्यात आला. तब्बल ८ दिवस मुंबईत जाळपोळ सुरू राहिली. गोळीबारात ५८ शिवसैनिक मरण पावले, २७४ जखमी झाले आणि १५१ पोलिसांनाही इजा झाली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.  वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुंबई शांत व्हावी म्हणून त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली. बाळासाहेबांनी तुरुंगातून पत्र जारी केले. रस्त्यावर उतरू नका, कायदा हाती घेऊ नका, शांतता पाळा, असे आवाहन बाळासाहेबांनी शिवसैनिकांना केले. त्यांच्या या आवाहनानंतर शिवसैनिक व मुंबई शांत झाली. पुढे ठाकरे व अन्य नेत्यांचीही सुटका झाली. या घटनेनंतर मुंबईवरील शिवसेनेचा प्रभाव व दबाव सर्वांना कळला. शिवसेनाप्रमुख मुंबई बंद करू शकतात, त्यांचे तितके वजन आहे, सेनेची तशी दहशत आहे, हे स्पष्ट झाले. त्याचा पुढील निवडणुकांत शिवसेनेला खूप फायदा झाला. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण