शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

...आणि बाळासाहेब ठाकरेंना अटक ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:36 IST

हे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने सुरू झाली. परप्रांतीयांची हॉटेल्स, दुकाने, तसेच अन्यत्रही दगडफेक सुरू झाली. तिथेही लाठीमार झाला. गोळीबार करण्यात आला. तब्बल ८ दिवस मुंबईत जाळपोळ सुरू राहिली.

संजीव साबडे -

शिवसेनेची १९६६ साली स्थापना झाली, तीच मुळी महाराष्ट्रात मराठी भाषकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरही सरकारी व बँकांतील नोकऱ्यांत परप्रांतीयांना प्राधान्य मिळत असल्याने मराठी भाषकांमध्ये संताप होता. शिवाय मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला असला तरी कर्नाटकात गेलेला मराठी भाषक भाग पुन्हा मिळावा, ही मराठी जनतेची आणि शिवसेनेची प्रमुख मागणी होती. सीमा प्रश्न खदखदत होता. सीमा प्रश्न सुटेपर्यंत केंद्रातील एकाही मंत्र्याला मुंबई व महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर १९६८ साली परळच्या कामगार मैदानावरून दिला होता; पण शिवसेना हे प्रत्यक्ष करेल, असे कोणाला वाटत नव्हते.  मोरारजी देसाई तेव्हा उपपंतप्रधान होते. त्यांचा मुंबई दौरा जाहीर झाला. मुळात मोरारजीभाईंबद्दल मराठी लोकांत राग होता. ते मराठीद्वेष्टे आहेत, महाराष्ट्राविषयी त्यांच्या मनात अढी आहे, असे सर्वांना वाटत होते. ते ८ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर पोहोचले. तेथून कारने दक्षिण मुंबईत येत असताना माहीम चर्चपाशी शिवसैनिकांनी त्यांची कार अडवली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला, त्यात अनेक शिवसैनिक जखमी झाले;  पण त्यामुळे वातावरण खूपच तापले. पोलिसांनी बाळासाहेब ठाकरे, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी आदींना अटक केली. ठाकरे यांना झालेली ही पहिली अटक.  हे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने सुरू झाली. परप्रांतीयांची हॉटेल्स, दुकाने, तसेच अन्यत्रही दगडफेक सुरू झाली. तिथेही लाठीमार झाला. गोळीबार करण्यात आला. तब्बल ८ दिवस मुंबईत जाळपोळ सुरू राहिली. गोळीबारात ५८ शिवसैनिक मरण पावले, २७४ जखमी झाले आणि १५१ पोलिसांनाही इजा झाली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.  वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुंबई शांत व्हावी म्हणून त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली. बाळासाहेबांनी तुरुंगातून पत्र जारी केले. रस्त्यावर उतरू नका, कायदा हाती घेऊ नका, शांतता पाळा, असे आवाहन बाळासाहेबांनी शिवसैनिकांना केले. त्यांच्या या आवाहनानंतर शिवसैनिक व मुंबई शांत झाली. पुढे ठाकरे व अन्य नेत्यांचीही सुटका झाली. या घटनेनंतर मुंबईवरील शिवसेनेचा प्रभाव व दबाव सर्वांना कळला. शिवसेनाप्रमुख मुंबई बंद करू शकतात, त्यांचे तितके वजन आहे, सेनेची तशी दहशत आहे, हे स्पष्ट झाले. त्याचा पुढील निवडणुकांत शिवसेनेला खूप फायदा झाला. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण