शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाकरे सरकारकडे कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधी नाही; कपिल पाटील यांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:37 IST

राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी 44 कोटीचा निधी दिली होता.

कल्याण-राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी 44 कोटीचा निधी दिली होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधीच मिळालेला नाही. भाजप आणि ठाकरे सरकार यांच्यात हाच फरक आहे, अशी टिका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे. या टिकेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील उद्यानाचा विकास माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून करण्यात आला होता. या उद्यानाचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी उपरोक्त टिका केली. या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी शशिकांत कांबळे, प्रेमनाथ भोईर, वरुण पाटील, मोरेश्वर भोईर, संजय कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी सांगितेल की, ठाणो-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पात भिवंडी ते कल्याण दरम्यान कामाची निविदा देखील अद्याप काढलेली नाही याकडे लक्ष वेधले.

आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान केला जात नाही असे वक्तव्य केले होते. याविषयी मंत्री पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मंदा म्हात्रे यांची काय समस्या आहे हे मी सांगू शकत नाही. मात्र मोदी सरकारने 11 महिलांना मंत्री पद दिले आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात महिला कधीच मंत्री झाल्या नव्हत्या. तरी देखील भाजपने महिलांचा सन्मान केला नाही असे वक्तव्य करणो हे अयोग्य आहे. 

ज्यांना बोलायचे आहे, त्यांनी थेट बोलावे 

महागाईच्या मुद्यावर कल्याणचे शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सोशल मिडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. 2014 मध्ये ज्यांना लोकसभेत निवडून दिले आहे. त्यांची जागा दाखवून द्या. याविषयी मंत्री पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जो ज्या संस्कृतीतून येतो. त्याची तशी भाषा असते. ही पोस्ट खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वच खासदारांना लागू होते. ज्यांना आम्हाला बोलायचे आहे. त्यांनी थेट आम्हाला बोलावे असे आव्हान पाटील यांनी केले आहे. 

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरे