शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत फक्त चर्चा; अद्याप निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:42 IST

अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

मुंबई : राज्यात ९वी ते १२वीच्या तब्बल ७० टक्के शाळा सुरू झाल्यानंतर नवीन वर्षात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील चर्चा शासन स्तरावर सुरू झाली आहे. मात्र अद्याप यावर अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांच्या काेराेना चाचण्या, शाळांची स्वच्छता, वर्गांचे नियोजन यांचे नियाेजन करावे लागणार असल्याने अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एससीईआरटीच्या माहितीप्रमाणे सध्या राज्यात नववी ते बारावीचे एक लाखाहून अधिक विद्यार्थी वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. मात्र पाचवी ते आठवीचे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा लहान असल्याने शाळा सुरू झाल्यावर त्यांचे आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घ्यावी लागेल.सद्य:स्थितीत नववी ते बारावीच्या वर्गांची उपस्थिती केवळ चार तासांची आणि ५० टक्के इतकीच आहे. त्याचप्रमाणे पहिली ते आठवीच्या वर्गांचे नियोजन करावे लागेल. सुरुवातीला विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कमीतकमी वेळ ठेवावी लागणार असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल. शासन स्तरावर याबाबतीत चर्चा सुरू असून आढावा घेतला जात आहे, असे सोळंकी यांनी सांगितले.पालकांकडून घ्यायच्या संमतीपत्रावरून गाेंधळअनेक जिल्ह्यांत शिक्षणाधिकाऱ्यांकडून पालकांकडून घ्यायच्या संमतीपत्राचा नमुना पाठविला जात असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये गाेंधळ आहे. सही करायची कशी, मुलांच्या सुरक्षेचे काय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. शिक्षकांच्या चाचण्या, शाळांची स्वच्छता, तासिकांचे नियोजन यासंदर्भातील मार्गदर्शन सूचनांशिवाय व्हायरल होत असलेल्या या मेसेजेसमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतही गोंधळाचे वातावरण आहे.