शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

राज्यभरातील कृषी व्यवहार ठप्प

By admin | Updated: November 15, 2016 18:47 IST

शासनाच्या ५०० व हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे आठ दिवसांपासून राज्यभरातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्या व ६०३ उपबाजार बंद आहेत.

ऑनलाइन लोकमत/ विवेक चांदूरकर
 
बुलडाणा, दि. 15 - शासनाच्या ५०० व हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे आठ दिवसांपासून राज्यभरातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्या व ६०३ उपबाजार बंद आहेत. त्यामुळे व्यापारी, अडते, हमाल- मापाडी व शेतकरी
अडचणीत सापडले असून, संपूर्ण कृषी बाजारपेठच ठप्प झाली आहे.
शासनाने ८ नोव्हेंबर रोजी ५०० व हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेताच बुधवारपासून राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. राज्यात एकूण ३०५ बाजार समित्या असून, ६०३ उपबाजार आहेत. या बाजार
समित्यांमध्ये व्यापारी, अडते, शेतकरी, हमाल- मापाडी व सफाई कामगार अशा लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. आठ दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे ही साखळी विस्कळीत झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका शेतकरी व
हमाल मापाडींना बसला आहे. दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती निवळून बाजार समिती पुन्हा सुरू होतील, अशी आशा शेतकरी व हमाल - मापाडींना होती.
मात्र, आठ दिवसांपासून बाजार समित्या बंदच आहेत. सध्या शेतातील सोयाबिन निघाले आहे. शेतकºयांना पिक निघाल्याबरोबरच कुटुंबाचे पालन पोषण करण्याकरिता तसेच उधारी व कर्जाचा भरण्याकरिता पैशांची नितांत गरज असते.
मात्र, बाजार समित्याच बंद असल्यामुळे शेतकºयांजवळ शेतमाल असूनही, त्याची विक्री करणे शक्य होत नाही आहे. आठ दिवसांपूर्वी शेतातील सोयाबिनची बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती. सध्या मात्र सोयाबिनची विक्री
ठप्प पडली आहे.
 
हमाल, मापाडींवर उपासमारीची पाळी
 हमाल व मापाडी कामगार यांच्यासोबतच बाजार समितीत शेतमालाची ने - आण करणारे रिक्षाचालक, बाजार समितीत सांडलेल्या धान्याची साफसफाई करणारे  मजूर, अडत्यांकडे कामाला असलेले कामगार या सर्वांचा उदनिर्वाह दररोजच्या
मजुरीवर चालतो. अनेक ठिकाणी हमाल मापाडी व मजुरांना दररोज सायंकाळी कामाचा मोबदला दिला जातो.  मात्र, आठ दिसांपासून बाजार समिती बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
 
साठवण व्यवस्था नसल्याने शेतक-यांच्या वाढल्या अडचणी
शेतकºयांनी सध्या खरीप हंगामातील शेतमालाची काढणी केली आहे. अनेक शेतक-यांकडे शेतमाल ठेवण्याकरिता साठवण व्यवस्था नाही. शेतकरी शेतमालाची काढणी केल्याबरोबर बाजार समितीत विक्री करतात. आठ दिवसांपासून बाजार
समित्या बंद असल्यामुळे शेतक-यांना शेतमाल शेतात ठेवावा लागत आहे. अशावेळी आग लागने किंवा शेतमाल चोरी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना शेतमालाची राखण करावी लागत असून, अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
 
आठ दिवसांपासून बाजार समितीतील व्यवहार ठप्प आहेत. शेतक-यांचा शेतमाल खरेदी करण्याकरिता व्यापा-यांना बँका पैसे देत नाहीत. त्यामुळे व्यापारी शेतमाल खरेदी करीत नाही. शासनाने बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून द्यायला हवी. असे केल्यास बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत होतील.
- लालचंद संचेती
अध्यक्ष, कृषि उत्पन्न बाजार समिती व्यापारी संघटना, महाराष्ट्र.
 
मागच्या आठ दिवसांपासून हमाल मापाडींचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. व्यापारी शेतमाल घेण्यास तयार आहेत. मात्र, सर्वांनाच पैशांची अडचण भासत आहे. लवकरात लवकर बाजार समिती सुरू होणे आवश्यक आहे.
- बबन खरे
अध्यक्ष, हमाल मापाडी संघटना, बुलडाणा.