शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

JNU Attack: हल्लेखोर बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 1:52 PM

हल्लेखोरांना तोंड लपवण्याची गरज का भासली; मुख्यमंत्र्यांचा सवाल

मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंसाचार घडवणाऱ्या बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. चेहरे लपवून हल्ले घडवणारे भेकड आहेत. त्यांच्यात इतकी हिंमत आहे तर मग ते तोंडावर मुखवटे लावून का फिरतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई होऊन हल्लेखोरांचे चेहरे देशासमोर यायला हवेत. हा संपूर्ण प्रकार कोणाच्या पाठिंब्यानं झाला ते पुढे कळेलच. त्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.जेएनयूमध्ये काल हिंसाचार झाला. काही बुरखाधाऱ्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांवर हल्ले केले. हे बुरखाधारी अतिशय भित्रे आहेत. त्यांच्यात इतकी हिंमत होती, तर त्यांना तोंड लपवायची गरज का भासली, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका निष्पक्ष वाटत नाही. मला यामध्ये राजकारण आणायचं नाही. पण बुरख्यामागचे चेहरे समोर यायला हवेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.जेएनयूसारखी परिस्थिती राज्यात निर्माण होऊ देणार नाही. राज्यातील एकाही विद्यार्थ्याच्या केसाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातल्या परिस्थितीबद्दल तरुणांच्या मनात भीती आणि राग आहे. देशातला तरुण कोणालाही घाबरत नाही. तरुणांच्या मनात असलेला उद्रेक माझ्याही मनात आहे. मी देशातल्या तरुणाईसोबत आहे. केंद्र सरकारनं तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा परिस्थिती बिकट होईल, असा इशारादेखील मुख्यमंत्र्यांनी दिला.  

टॅग्स :jnu attackजेएनयूUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना