शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा वेळीच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 13:04 IST

इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतीकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकते. मात्र त्याचवेळी इंदिराजी आणि मोदी-शाह यांची तुलना होऊ शकत नाही, अस आव्हाड ट्विट करून म्हणाले. 

मुंबई - भाजपला शिंगावर घेणारे आणि आपल्या सडेतोड भुमिकेसाठी चर्चेत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर आपल्या वक्तव्याचा खुलासा करण्याची वेळ आली आहे. बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर त्यांनी खुलासा केला आहे.

इंदिरा गांधी यांनी असाच एकेकाळी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरुद्ध कोणीही बोलण्यास तयार नव्हते. मात्र जयप्रकाश नारायण यांनी याविरुद्ध आवाज उठवला. त्याचा परिणाम झाला आणि इंदिरा गांधी यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 

काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच इंदिराजी यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावले. त्या जगात एक कणखर व्यक्ती म्हणून परिचीत आहेत. आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर वेळीच खुलासा केला ते बरं झालं. मात्र आमच्या नेत्यांचा अनादर केल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा  अशोक चव्हाण यांनी ट्विट करून दिला आहे.  

या संदर्भात खुलासा करताना आव्हाड म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतीकारी होते, पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकते. मात्र त्याचवेळी इंदिराजी आणि मोदी-शाह यांची तुलना होऊ शकत नाही, असही आव्हाड ट्विट करून म्हणाले.