शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार-अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी; "दमदाटी करून घाबरवणे हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 09:54 IST

जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना का घाबरायचे? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.

मुंबई - शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात वादंग सुरू आहे. त्यात जितेंद्र आव्हाडांनी उडी घेत दमदाटी करणं हा अजितदादांचा स्वभाव दोष असून प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही अशा शब्दात टोला लगावला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दमदाटी करणे हा अजितदादांचा स्वभाव दोष आहे. मी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशी बघत होतो, हे गप्प बस, उठू नकोस...असं चालत नाही. तुम्ही घरी नाही, सार्वजनिक जीवनात आहे. प्रत्येकाला हृदयात मानसन्मान असतो. जेव्हा टीव्ही चालू असताना तेव्हा मला म्हणाले, ये गप रे...माझी मुलगी, पत्नी, नातेवाईक बघत असतील तर काय या जितेंद्रची इज्जत आहे असा प्रश्न निर्माण होतो. मी त्यांच्यापासून लांबच राहायचो. तुला पाडून दाखवतो असं जमत नाही. ती मोठी माणसं आहेत, कुणालाही पाडू शकतात, ४८ च्या ४८ जागा निवडून आणू शकतात.मोठी माणसं आहेत. विरोधकांना काय खुपतं आणि ते भाजपासोबत गेले हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. दुसऱ्याचे मन ओळखता येत नाही. मी भविष्यकर्ता नाही. प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही. या जगामध्ये माणूस यमाला घाबरत नाही. तो कधी ना कधी येणारच आहे ना..जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना का घाबरायचे? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. 

तर निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या निर्णयाविषयी बोलणं चुकीचे आहे. सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला आमच्या निकालावर भाकीत वर्तवू नका असं बजावलं होते. परंतु सुनील तटकरे हे घड्याळ चिन्ह आम्हालाच मिळणार असं विधान करतायेत. निवडणूक आयोगाचा निर्णय कधीही येऊ शकतो अशावेळी हे विधान केले जातंय. त्यातून एकप्रकारे निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा ते प्रयत्न करतायेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा गटावर केला आहे. सोबतच लढायचं तर कमळावरच..भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाला घरचा रस्ता दाखवतील. वेळ आल्यावर सगळे समोर येईल असंही आव्हाडांनी म्हटलं. 

प्रभू श्रीरामाचा निवडणुकीसाठी वापर

प्रभू श्रीराम हे भाजपाचा निवडणुकीच्या ३ महिन्यातील बाजारच असतो. धार्मिक बाजार मांडून देशाचे वातावरण खराब करायचं आणि निवडणूक लढायची हे भाजपाचे धोरण आजचे नाही तर वर्षोनुवर्षाचे आहे. आजच्या तरुणपिढीला हे चालत नाही. बाहेरच्या देशातील परिस्थिती बघून आपल्या देशात काय सुरू आहे हा प्रश्न त्यांना पडतो अशा शब्दात आव्हाडांनी भाजपावर आरोप केले. 

दरम्यान, मी ज्या काँग्रेसला ओळखतो तो पक्ष नाही तर चळवळ आहे. काँग्रेसची विचारसरणी आहे. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिले, देशाची विचारधारा निर्माण केली, अहिंसेने मार्ग काढता येतो. अहिंसेनेच ब्रिटीशांना पराभूत केले. गांधींची विचारधाराच काँग्रेसची विचारधारा आहे असं आव्हाडांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAjit Pawarअजित पवार