शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अजित पवार-अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी; "दमदाटी करून घाबरवणे हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 09:54 IST

जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना का घाबरायचे? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.

मुंबई - शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात वादंग सुरू आहे. त्यात जितेंद्र आव्हाडांनी उडी घेत दमदाटी करणं हा अजितदादांचा स्वभाव दोष असून प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही अशा शब्दात टोला लगावला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दमदाटी करणे हा अजितदादांचा स्वभाव दोष आहे. मी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशी बघत होतो, हे गप्प बस, उठू नकोस...असं चालत नाही. तुम्ही घरी नाही, सार्वजनिक जीवनात आहे. प्रत्येकाला हृदयात मानसन्मान असतो. जेव्हा टीव्ही चालू असताना तेव्हा मला म्हणाले, ये गप रे...माझी मुलगी, पत्नी, नातेवाईक बघत असतील तर काय या जितेंद्रची इज्जत आहे असा प्रश्न निर्माण होतो. मी त्यांच्यापासून लांबच राहायचो. तुला पाडून दाखवतो असं जमत नाही. ती मोठी माणसं आहेत, कुणालाही पाडू शकतात, ४८ च्या ४८ जागा निवडून आणू शकतात.मोठी माणसं आहेत. विरोधकांना काय खुपतं आणि ते भाजपासोबत गेले हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. दुसऱ्याचे मन ओळखता येत नाही. मी भविष्यकर्ता नाही. प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही. या जगामध्ये माणूस यमाला घाबरत नाही. तो कधी ना कधी येणारच आहे ना..जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना का घाबरायचे? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. 

तर निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या निर्णयाविषयी बोलणं चुकीचे आहे. सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला आमच्या निकालावर भाकीत वर्तवू नका असं बजावलं होते. परंतु सुनील तटकरे हे घड्याळ चिन्ह आम्हालाच मिळणार असं विधान करतायेत. निवडणूक आयोगाचा निर्णय कधीही येऊ शकतो अशावेळी हे विधान केले जातंय. त्यातून एकप्रकारे निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा ते प्रयत्न करतायेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा गटावर केला आहे. सोबतच लढायचं तर कमळावरच..भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाला घरचा रस्ता दाखवतील. वेळ आल्यावर सगळे समोर येईल असंही आव्हाडांनी म्हटलं. 

प्रभू श्रीरामाचा निवडणुकीसाठी वापर

प्रभू श्रीराम हे भाजपाचा निवडणुकीच्या ३ महिन्यातील बाजारच असतो. धार्मिक बाजार मांडून देशाचे वातावरण खराब करायचं आणि निवडणूक लढायची हे भाजपाचे धोरण आजचे नाही तर वर्षोनुवर्षाचे आहे. आजच्या तरुणपिढीला हे चालत नाही. बाहेरच्या देशातील परिस्थिती बघून आपल्या देशात काय सुरू आहे हा प्रश्न त्यांना पडतो अशा शब्दात आव्हाडांनी भाजपावर आरोप केले. 

दरम्यान, मी ज्या काँग्रेसला ओळखतो तो पक्ष नाही तर चळवळ आहे. काँग्रेसची विचारसरणी आहे. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिले, देशाची विचारधारा निर्माण केली, अहिंसेने मार्ग काढता येतो. अहिंसेनेच ब्रिटीशांना पराभूत केले. गांधींची विचारधाराच काँग्रेसची विचारधारा आहे असं आव्हाडांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAjit Pawarअजित पवार