शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही; VIP आमंत्रणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 09:40 IST

मंदिरात आमंत्रण दिले असेल तर या ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही असं आव्हाडांनी म्हटलं.

मुंबई - Jitendra Awhad on Ram Mandir ( Marathi News ) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मात्र राम मंदिर सोहळ्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापू लागले आहे. या उद्घाटन सोहळ्याला कुणाकुणाला निमंत्रित करणार यावर सस्पेन्स आहे. मात्र उद्धव ठाकरे VVIP यादीत नाहीत असं विधान भाजपा नेते महाजन यांनी केले त्यानंतर त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. राम मंदिराच्या निमंत्रणावरून सुरु असलेल्या वादात आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत भाजपावर निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंदिरात आमंत्रण दिले असेल तर या ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही. मंदिर कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. ही बापाची मालमत्ता होती तेव्हाच चार्तुवर्ण, क्षुद्र जन्माला आले आणि त्यांना देवळाच्या बाहेर उभं करण्यात आले. तुम्ही आजपण आम्हाला देवळाच्या बाहेर उभं करणार?, तुम्ही आजपण आम्हाला आमंत्रण देणार नाही? आणि परत चार्तुवर्णाची निर्मिती होणार. तुमच्या आमंत्रणाची आणि तुम्ही बोलवण्याची वाट बघणारे आम्ही नाही. आम्हाला जेव्हा जायचे असेल तेव्हा रामाचे नाव घेऊन राम मंदिरात जाऊ. राम कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. आमंत्रण आलं का ही कुठली नवीन संस्कृती, तुमच्या आमंत्रणाची वाट बघणार नाही. आम्हाला जायचे तेव्हा मंदिरात जाऊ असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्यादिवशी उद्घाटन होणार त्यादिवशी जाऊ, आम्हाला तुम्ही अडवणार का? बाहेर ठेवणार? आम्ही क्षुद्र आहोत म्हणून आम्हाला मंदिराच्या बाहेर उभं करणार तुम्ही? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून हे सर्व घालवले. काळाराम मंदिरात प्रवेश केला तेव्हाच त्यांनी इशारा दिला. मंदिरापासून तुम्ही रोखू शकत नाही. महाडमध्ये चवदार पाण्याचं आंदोलन केले. हे सर्व बंद करावेच लागेल असा इशारा त्यांनी दिला. संविधानाच्या माध्यमातून हे बंद करून टाकले असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला लगावला. 

दरम्यान, देशामध्ये सर्वांना मंदिरे उघडी करणारे बाबासाहेब हवेत की छोटे दरवाजे करून केवळ VIP दर्शन हे चालणार नाही. दरवाजे तोडून टाकू. तुम्ही  आम्हाला आता रोखू शकत नाही. कायद्याने रोखता येणार नाही. राम मंदिर हे कुणाच्या बापाची जहागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही. एखादे दिवस जे काही थोतांड करायचे असेल ते करून घ्या. निवडणुकीचं वर्ष आले की हे रामाचा बाजार करतात हे अख्ख्या देशाला माहिती आहे. साडेचार वर्ष काहीच काम करायचे नाही आणि शेवटच्या वर्षी राम राम राम करायचे. जनता यांच्यावर राम राम राम म्हणायची वेळ आणणारच आहे असा इशाराही आव्हाडांनी भाजपाला दिला. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपा