शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही; VIP आमंत्रणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 09:40 IST

मंदिरात आमंत्रण दिले असेल तर या ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही असं आव्हाडांनी म्हटलं.

मुंबई - Jitendra Awhad on Ram Mandir ( Marathi News ) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मात्र राम मंदिर सोहळ्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापू लागले आहे. या उद्घाटन सोहळ्याला कुणाकुणाला निमंत्रित करणार यावर सस्पेन्स आहे. मात्र उद्धव ठाकरे VVIP यादीत नाहीत असं विधान भाजपा नेते महाजन यांनी केले त्यानंतर त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. राम मंदिराच्या निमंत्रणावरून सुरु असलेल्या वादात आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत भाजपावर निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंदिरात आमंत्रण दिले असेल तर या ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही. मंदिर कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. ही बापाची मालमत्ता होती तेव्हाच चार्तुवर्ण, क्षुद्र जन्माला आले आणि त्यांना देवळाच्या बाहेर उभं करण्यात आले. तुम्ही आजपण आम्हाला देवळाच्या बाहेर उभं करणार?, तुम्ही आजपण आम्हाला आमंत्रण देणार नाही? आणि परत चार्तुवर्णाची निर्मिती होणार. तुमच्या आमंत्रणाची आणि तुम्ही बोलवण्याची वाट बघणारे आम्ही नाही. आम्हाला जेव्हा जायचे असेल तेव्हा रामाचे नाव घेऊन राम मंदिरात जाऊ. राम कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. आमंत्रण आलं का ही कुठली नवीन संस्कृती, तुमच्या आमंत्रणाची वाट बघणार नाही. आम्हाला जायचे तेव्हा मंदिरात जाऊ असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्यादिवशी उद्घाटन होणार त्यादिवशी जाऊ, आम्हाला तुम्ही अडवणार का? बाहेर ठेवणार? आम्ही क्षुद्र आहोत म्हणून आम्हाला मंदिराच्या बाहेर उभं करणार तुम्ही? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून हे सर्व घालवले. काळाराम मंदिरात प्रवेश केला तेव्हाच त्यांनी इशारा दिला. मंदिरापासून तुम्ही रोखू शकत नाही. महाडमध्ये चवदार पाण्याचं आंदोलन केले. हे सर्व बंद करावेच लागेल असा इशारा त्यांनी दिला. संविधानाच्या माध्यमातून हे बंद करून टाकले असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला लगावला. 

दरम्यान, देशामध्ये सर्वांना मंदिरे उघडी करणारे बाबासाहेब हवेत की छोटे दरवाजे करून केवळ VIP दर्शन हे चालणार नाही. दरवाजे तोडून टाकू. तुम्ही  आम्हाला आता रोखू शकत नाही. कायद्याने रोखता येणार नाही. राम मंदिर हे कुणाच्या बापाची जहागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही. एखादे दिवस जे काही थोतांड करायचे असेल ते करून घ्या. निवडणुकीचं वर्ष आले की हे रामाचा बाजार करतात हे अख्ख्या देशाला माहिती आहे. साडेचार वर्ष काहीच काम करायचे नाही आणि शेवटच्या वर्षी राम राम राम करायचे. जनता यांच्यावर राम राम राम म्हणायची वेळ आणणारच आहे असा इशाराही आव्हाडांनी भाजपाला दिला. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपा