शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही; VIP आमंत्रणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 09:40 IST

मंदिरात आमंत्रण दिले असेल तर या ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही असं आव्हाडांनी म्हटलं.

मुंबई - Jitendra Awhad on Ram Mandir ( Marathi News ) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मात्र राम मंदिर सोहळ्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापू लागले आहे. या उद्घाटन सोहळ्याला कुणाकुणाला निमंत्रित करणार यावर सस्पेन्स आहे. मात्र उद्धव ठाकरे VVIP यादीत नाहीत असं विधान भाजपा नेते महाजन यांनी केले त्यानंतर त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. राम मंदिराच्या निमंत्रणावरून सुरु असलेल्या वादात आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत भाजपावर निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंदिरात आमंत्रण दिले असेल तर या ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही. मंदिर कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. ही बापाची मालमत्ता होती तेव्हाच चार्तुवर्ण, क्षुद्र जन्माला आले आणि त्यांना देवळाच्या बाहेर उभं करण्यात आले. तुम्ही आजपण आम्हाला देवळाच्या बाहेर उभं करणार?, तुम्ही आजपण आम्हाला आमंत्रण देणार नाही? आणि परत चार्तुवर्णाची निर्मिती होणार. तुमच्या आमंत्रणाची आणि तुम्ही बोलवण्याची वाट बघणारे आम्ही नाही. आम्हाला जेव्हा जायचे असेल तेव्हा रामाचे नाव घेऊन राम मंदिरात जाऊ. राम कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. आमंत्रण आलं का ही कुठली नवीन संस्कृती, तुमच्या आमंत्रणाची वाट बघणार नाही. आम्हाला जायचे तेव्हा मंदिरात जाऊ असं त्यांनी सांगितले. 

तसेच ज्यादिवशी उद्घाटन होणार त्यादिवशी जाऊ, आम्हाला तुम्ही अडवणार का? बाहेर ठेवणार? आम्ही क्षुद्र आहोत म्हणून आम्हाला मंदिराच्या बाहेर उभं करणार तुम्ही? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून हे सर्व घालवले. काळाराम मंदिरात प्रवेश केला तेव्हाच त्यांनी इशारा दिला. मंदिरापासून तुम्ही रोखू शकत नाही. महाडमध्ये चवदार पाण्याचं आंदोलन केले. हे सर्व बंद करावेच लागेल असा इशारा त्यांनी दिला. संविधानाच्या माध्यमातून हे बंद करून टाकले असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला लगावला. 

दरम्यान, देशामध्ये सर्वांना मंदिरे उघडी करणारे बाबासाहेब हवेत की छोटे दरवाजे करून केवळ VIP दर्शन हे चालणार नाही. दरवाजे तोडून टाकू. तुम्ही  आम्हाला आता रोखू शकत नाही. कायद्याने रोखता येणार नाही. राम मंदिर हे कुणाच्या बापाची जहागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही. एखादे दिवस जे काही थोतांड करायचे असेल ते करून घ्या. निवडणुकीचं वर्ष आले की हे रामाचा बाजार करतात हे अख्ख्या देशाला माहिती आहे. साडेचार वर्ष काहीच काम करायचे नाही आणि शेवटच्या वर्षी राम राम राम करायचे. जनता यांच्यावर राम राम राम म्हणायची वेळ आणणारच आहे असा इशाराही आव्हाडांनी भाजपाला दिला. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपा