शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; पहिल्यांदाच मनातले सर्वकाही बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:46 IST

तुम्हाला स्वत:ला कोरोना झाला मग तुम्ही का राजीनामा दिला नाही? मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांना कोरोना झाला त्यांचा राजीनामा घेतला नाही. एकट्या जितेंद्रचा राजीनामा घेताना तुम्हाला बरं वाटलं ना. असं आव्हाडांनी अजित पवारांना म्हटलं

शिर्डी - मी सकाळी ६ वाजता उठतो. सकाळी उठल्यावर करणार काय? अधिकाऱ्यांची झोप खराब करायची? ६ वाजता काम सुरू होत नाही. तुम्हाला झोप लागत नाही ही आमची चूक आहे का? कुठल्याही अधिकाऱ्याला अजित पवारांचे ६ वाजताचे बोलावणे आवडायचे नाही. आमचेही अधिकारी मित्र आहेत. तुमचे आऊटपूट काय? प्रत्येक विभागात हस्तक्षेप करणे. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मंत्र्यांना अस्वस्थ करणे हे तुम्ही केले नाही का? तुम्ही सुनील केदार यांना त्रास दिला नाही का? असे अनेक मंत्री होते जे खासगी बोलायचे. उपमुख्यमंत्रिपदच संविधानिक नाही. मग कुठल्या अधिकाराखाली तुम्ही बैठका घेत होता? असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनीअजित पवारांवर केला आहे. 

जितेंद्र आव्हाडांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात माध्यमांशी बोलताना सर्वकाही पहिल्यांदाच बोलले. आव्हाड म्हणाले की, माझ्याकडे पालकमंत्री पद येऊच दिले नाही. एकनाथ शिंदे-अजित पवार हेच पालकमंत्री ठरवत होते. मला पालकमंत्री पद द्या असं मी अजित पवारांना भेटून सांगितले होते. मला एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले. जितेंद्र आम्हाला रायगड हवं होते. आम्ही पालघर तुम्हाला द्यायला तयार होतो. मी खास तुझ्यासाठी पालघर सोडले होते. परंतु अजित पवार रायगड सोडण्यास तयार नव्हते. कारण आदिती तटकरेंना रायगडचे पालकमंत्री बनवायचे होते. माझा प्रश्न अजित पवारांना तेव्हाच होता. मी पक्षात ज्येष्ठ नाही का? मला कोरोना झाल्यानंतर २ तासांत तुम्ही पालकमंत्री पदावरून काढलं, त्यानंतर कोरोना झालेल्या किती जणांना काढले? या पक्षात सावत्र होतो का? असा सवाल त्यांनी विचारला. 

त्याचसोबत तुम्हाला स्वत:ला कोरोना झाला मग तुम्ही का राजीनामा दिला नाही? मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांना कोरोना झाला त्यांचा राजीनामा घेतला नाही. एकट्या जितेंद्रचा राजीनामा घेताना तुम्हाला बरं वाटलं ना...लगेच स्वत:चा दत्तात्रय भरणे तिथे नेमला. सोलापूरचे पालकमंत्रीपद शरद पवार साहेबांनी स्वत: बोलावून घ्यायला सांगितले. अजित पवारांनी बावनकुळेंना किती मदत केली हा इतिहास पाहा. अजित पवारांची कार्यशैली वेगळी आहे. मी खूप कडक आणि शिस्तप्रिय आहे याचा गाजावाजा करत असतात. अजित पवारांनी स्वत:चा एकतरी निर्णय सांगावा जो धोरणात्मक आणि महाराष्ट्राच्या हिताचा आहे. राजकीय इतिहासात तो लिहिला जाईल. असे शरद पवारांचे १०० निर्णय सांगितले जातील. इतिहासात नोंद केली जाईल असं एक काम तरी अजित पवारांनी सांगावे असा थेट सवाल आव्हाडांनी अजित पवारांना विचारला. 

दरम्यान, सुनील तटकरे हे आपल्या पक्षाशी प्रामाणिक नाहीत ही शरद पवारांना जाणीव होती. रोज सकाळी जाऊन चला ना भाजपात जाऊ, असं विधाने करत होते. २०१९ ला अजित पवारांचा शपथविधी झाला. सकाळी ८ वाजता तटकरे शरद पवारांच्या बंगल्यावर जसं यांना काहीच माहिती नाही असं केले. इतका मोठा नटसम्राट मी माझ्या आयुष्यात बघितला नाही असा टोलाही आव्हाडांनी तटकरेंना लगावला.

तुम्हाला रामाचे दर्शन घेण्याचा अधिकार नाही

तुम्ही अजित पवारांना राम मंदिरात घेऊन जाणार आहात का? कुठल्या अधिकाराने? एकीकडे आईवडिलांसाठी रामानं १४ वर्ष वनवास भोगला तर दुसरीकडे या लोकांनी सत्तेसाठी शरद पवारांना बाहेर ढकललं. तुम्हाला रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार नाही अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

...तर संविधान अरबी समुद्रात बुडवतील

स्वप्न मीदेखील बघत असतो. स्वप्न बघणे चुकीचे नाही. १०० टक्के या देशातील लोकशाही नेस्तनाबूद होतेय. संविधान संपवलं जाईल. जर त्यांचे ४०० खासदार निवडून आले तर हे संविधान अरबी समुद्रात बुडवलं जाईल.तुम्ही ज्यापद्धतीने वागता त्यानं संविधान टिकणार नाही. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. देशात लोकशाही ठेवायचीच नाही. लोकशाही, संविधान पायदळी तुडवायचं आहे. ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे. या देशात आंदोलनाला प्रचंड महत्त्व आहे. ट्रकवाल्यांनी आंदोलनाची धमकी दिल्यानंतर ४८ तासांत कायदा मागे घेतला. लोकशाहीविरोधी कृत्य सुरु आहेत असा आरोप आव्हाडांनी केला. 

एकनाथ शिंदेंकडून हे अपेक्षित नाही

एखाद्या मुख्यमंत्र्यांनी मतांसाठी एखाद्या धर्माला उकसवणं आणि तिथे वाद होईल अशी विधाने करणे हे चुकीचे आहे. तुम्ही एकनाथ शिंदे नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणे तुमचे काम आहे. तुमच्या मंत्रिमंडळातील भुजबळ ओबीसींना उकसवतात. तुम्ही मराठा समाजाला उकसवताय. तुम्हाला महाराष्ट्रात आग हवी का? महाराष्ट्र जिंकता येणार नाही यासाठी काहीही करून राज्यात जातीजातीत तेढ निर्माण करून भांडणे लावा हे हवंय का? एकनाथ शिंदेंकडून हे अपेक्षित नाही असं आव्हाडांनी सांगितले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरे