शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 20:28 IST

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकला.

२९ जून २०२४ या दिवशी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकला. टीम इंडिया भारतात परतताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वविजेत्या संघावर तब्बल १२५ कोटी रुपयांचा वर्षाव केला. भारतात रोहितसेना परतताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मग क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत विश्वविजेत्यांची झलक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी हजारोच्या संख्येने गर्दी केली. बीसीसीआयसह विविध राज्य सरकारांनी टीम इंडियातील खेळाडूंना बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिली. टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर आरोप करत राज्य सरकावर टीका केली.

जितेंद्र आव्हाड यांनी विश्वविजेत्या खेळाडूंना अद्याप बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याचा दावा केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांनी हे आरोप केले. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या विजेत्या संघातील खेळाडूंना कोट्यवधी रूपयांची बक्षिसे जाहीर केली. काल आम्ही ज्या हाॅटेलमध्ये मिटींगसाठी बसलो होतो. त्या हाॅटेलमध्ये विश्वचषक विजेत्या संघातील काही खेळाडू मला भेटले. बोलता-बोलता म्हणाले की, आम्हाला जी बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, ती अद्याप आम्हाला मिळालेलीच नाहीत, ही बाब खटकणारी आहे, असे आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले.

तसेच माझी महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की, इथे-तिथे पैसे वाटतच आहात. तर ज्यांना कबूल केले आहेत. त्यांचे तरी पैसे वाटून टाका. जसे हे क्रिकेटपटू मला बोलले तसे ते अनेकजणांना बोलले असतील. त्यातून सरकारचीच प्रतिमा मलिन होतेय, याचीच मला काळजी आहे, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडT20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024Team Indiaभारतीय क्रिकेट संघMaharashtraमहाराष्ट्र