शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 20:28 IST

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकला.

२९ जून २०२४ या दिवशी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकला. टीम इंडिया भारतात परतताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वविजेत्या संघावर तब्बल १२५ कोटी रुपयांचा वर्षाव केला. भारतात रोहितसेना परतताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मग क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत विश्वविजेत्यांची झलक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी हजारोच्या संख्येने गर्दी केली. बीसीसीआयसह विविध राज्य सरकारांनी टीम इंडियातील खेळाडूंना बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिली. टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर आरोप करत राज्य सरकावर टीका केली.

जितेंद्र आव्हाड यांनी विश्वविजेत्या खेळाडूंना अद्याप बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याचा दावा केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांनी हे आरोप केले. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या विजेत्या संघातील खेळाडूंना कोट्यवधी रूपयांची बक्षिसे जाहीर केली. काल आम्ही ज्या हाॅटेलमध्ये मिटींगसाठी बसलो होतो. त्या हाॅटेलमध्ये विश्वचषक विजेत्या संघातील काही खेळाडू मला भेटले. बोलता-बोलता म्हणाले की, आम्हाला जी बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, ती अद्याप आम्हाला मिळालेलीच नाहीत, ही बाब खटकणारी आहे, असे आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले.

तसेच माझी महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की, इथे-तिथे पैसे वाटतच आहात. तर ज्यांना कबूल केले आहेत. त्यांचे तरी पैसे वाटून टाका. जसे हे क्रिकेटपटू मला बोलले तसे ते अनेकजणांना बोलले असतील. त्यातून सरकारचीच प्रतिमा मलिन होतेय, याचीच मला काळजी आहे, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडT20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024Team Indiaभारतीय क्रिकेट संघMaharashtraमहाराष्ट्र