शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 20:28 IST

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकला.

२९ जून २०२४ या दिवशी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकला. टीम इंडिया भारतात परतताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वविजेत्या संघावर तब्बल १२५ कोटी रुपयांचा वर्षाव केला. भारतात रोहितसेना परतताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मग क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत विश्वविजेत्यांची झलक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी हजारोच्या संख्येने गर्दी केली. बीसीसीआयसह विविध राज्य सरकारांनी टीम इंडियातील खेळाडूंना बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिली. टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर आरोप करत राज्य सरकावर टीका केली.

जितेंद्र आव्हाड यांनी विश्वविजेत्या खेळाडूंना अद्याप बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याचा दावा केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांनी हे आरोप केले. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या विजेत्या संघातील खेळाडूंना कोट्यवधी रूपयांची बक्षिसे जाहीर केली. काल आम्ही ज्या हाॅटेलमध्ये मिटींगसाठी बसलो होतो. त्या हाॅटेलमध्ये विश्वचषक विजेत्या संघातील काही खेळाडू मला भेटले. बोलता-बोलता म्हणाले की, आम्हाला जी बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, ती अद्याप आम्हाला मिळालेलीच नाहीत, ही बाब खटकणारी आहे, असे आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले.

तसेच माझी महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की, इथे-तिथे पैसे वाटतच आहात. तर ज्यांना कबूल केले आहेत. त्यांचे तरी पैसे वाटून टाका. जसे हे क्रिकेटपटू मला बोलले तसे ते अनेकजणांना बोलले असतील. त्यातून सरकारचीच प्रतिमा मलिन होतेय, याचीच मला काळजी आहे, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडT20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024Team Indiaभारतीय क्रिकेट संघMaharashtraमहाराष्ट्र