शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

झारखंडच्या निकालानंतर शरद पवारांचा मोदी आणि भाजपाला टोला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 17:45 IST

झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे.

मुंबई -  लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर भाजपाची हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत पिछेहाट झाली होती. आता वर्षाच्या अखेरीस झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. झारखंडच्या जनतेने भाजपाला नाकारले आहे. संधी मिळताच देशातील इतर मतदारही झारखंडप्रमाणेच कौल देतील, असे शरद पवार म्हणाले. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसी संवाद साधला. ''भाजपावर जनतेची नाराजी आहे हे या निकालांमधून दिसत आहे. आज लागलेल्या निकालांमधून झारखंडच्या जनतेने भाजपाला नाकारले आहे. संधी मिळताच देशातील इतर मतदारही झरखंडप्रमाणेच कौल देतील. या निकालांसाठी मी झारखंडमधील जनतेचे आभार मानतो.''असे शरद पवार म्हणाले. 

''झारखंडसह, महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली शक्ती आणि आर्थिक ताकद यांना न जुमानता इथल्या जनतेने भाजपाला नाकारले आहे,''' असेही शरद पवार यांनी सांगितले. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीने स्पष्ट बहुमतासह सत्ता खेचून आणली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी