शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर जयंत पाटलांनी दिली 'मोठी' प्रतिक्रिया ;म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 13:50 IST

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर यातून आमच्या तीन पक्षांची एकजूट अजून बळकट होणार आहे...

पुणे : शिवसेना नेते व आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर ईडीने छापे टाकल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यात महाविकास आघाडीतील नेते व विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान शाब्दिक युद्ध छेडले गेले आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया देताना भाजपवर घणाघाती टीका देखील केली आहे.  

पिंपरी चिंचवड येथे पुणे पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील हे आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, पार्थ पवार आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर छापे टाकले असले तरी यातून काही हाती लागेल असे मला वाटत नाही. मात्र राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर यातून आमच्या तीन पक्षांची एकजूट अजून बळकट होणार आहे. पण विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांना त्रास देण्याची भाजपची ही जुनी परंपराच आहे. 

पुढे पाटील म्हणाले, भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते याघडीला अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते पदवीधर निवडणुकीत मनापासून काम करताना पाहायला मिळत नाहीत. त्याचबरोबर शिवसेनेसारखा पक्ष या निवडणुकीत आपल्यासोबत आहे. त्याचा फटका निश्चितच भाजपला बसणार आहे. एकंदरीत या परिस्थितीचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे, तसेच त्यांच्या उमेदवाराकडे प्रचारात मांडण्यासारखे कोणतेही मुद्दे नाही 

पदवीधर निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या नाराजीचा मोठा फटका भाजपाला बसणार असल्याचे मत देखील पाटील यांनी यावेळी नोंदवले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाpratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण