शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:51 IST

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनाही दूर सारण्याचा प्लॅन केलेला आहे, असे विधान केले. 

Jayant Patil Maharashtra Budget News: 'या अर्थसंकल्पाचं वर्णन करताना दुर्दैवाने मला हेच सांगावं लागतंय की, बडा घर आणि पोकळ वासा. २३७ आमदारांचं बहुमत सरकारच्या मागे आहे आणि ज्यांनी बहुमत दिलं, ते फार आशा करून महाराष्ट्रातील जनता टीव्ही समोर बसली होती. त्यांच्या पदरी निराशा आली', असे म्हणत जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर बोलताना महायुतीवर टीका केली. गेल्या सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख करत 'एकनाथ शिंदेंना दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे', असेही ते म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधानसभेत मंगळवारी अर्थसंकल्पावर चर्चा झाली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, "मागच्या भाषणात अजितदादांनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते. पण, यावेळी तुकोबांना दादांनी दूर केलं आहे. आणि प्रश्न असा आहे की, का अजितदादा तुकोबांपासून दूर गेले? हरकत नाही. पण, तुकोबांबरोबर आता एकनाथलाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे", असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला.

याच मुद्द्याला धरून जयंत पाटील पुढे म्हणाले की, "एकनाथरावांनी जे काही निर्णय घेतलेले, आनंदाचा शिधा, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना याचा काही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाचं हे एक वैशिष्ट्ये आहे."

जयंत पाटील म्हणाले, 'प्राण जाए पर वचन ना जाए'

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांवरूनही जयंत पाटलांनी महायुती सरकारला घेरले. ते म्हणाले, "प्रभू रामाचा उल्लेख भाषणात झाला. रामटेकला सांस्कृतिक महोत्सव करणार आहेत. पण, असं म्हटलं जातं की, 'रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए.' विधानसभेच्या निवडणुकीआधी जी वचनं आपण महाराष्ट्राला दिली. माझ्याकडे मोठा गठ्ठा आहे. त्यात संकल्प पत्र २०२४चा. त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही", असे म्हणत जयंत पाटलांनी सरकारला कोंडीत पकडले. 

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कशी होणार? पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

"कोरोना काळात शिवभोजन थाळीने लोकांना आधार दिला. ती थाळी बंद होऊ नये, एवढी अपेक्षा करतो. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याचे मुख्यमंत्री सतत सांगतात. त्यासाठी आपल्या राज्याच्या विकास वाढीचा दर १४-१५ टक्क्यांवर गेला पाहिजे. मागच्या वेळी तो, ८ टक्के होता, तो आता ७.३ टक्के खाली आला. त्यामुळे ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी होणार आणि कधी होणार?", असा सवालही जयंत पाटलांनी केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार