शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:51 IST

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनाही दूर सारण्याचा प्लॅन केलेला आहे, असे विधान केले. 

Jayant Patil Maharashtra Budget News: 'या अर्थसंकल्पाचं वर्णन करताना दुर्दैवाने मला हेच सांगावं लागतंय की, बडा घर आणि पोकळ वासा. २३७ आमदारांचं बहुमत सरकारच्या मागे आहे आणि ज्यांनी बहुमत दिलं, ते फार आशा करून महाराष्ट्रातील जनता टीव्ही समोर बसली होती. त्यांच्या पदरी निराशा आली', असे म्हणत जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर बोलताना महायुतीवर टीका केली. गेल्या सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख करत 'एकनाथ शिंदेंना दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे', असेही ते म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधानसभेत मंगळवारी अर्थसंकल्पावर चर्चा झाली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, "मागच्या भाषणात अजितदादांनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते. पण, यावेळी तुकोबांना दादांनी दूर केलं आहे. आणि प्रश्न असा आहे की, का अजितदादा तुकोबांपासून दूर गेले? हरकत नाही. पण, तुकोबांबरोबर आता एकनाथलाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे", असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला.

याच मुद्द्याला धरून जयंत पाटील पुढे म्हणाले की, "एकनाथरावांनी जे काही निर्णय घेतलेले, आनंदाचा शिधा, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना याचा काही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाचं हे एक वैशिष्ट्ये आहे."

जयंत पाटील म्हणाले, 'प्राण जाए पर वचन ना जाए'

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांवरूनही जयंत पाटलांनी महायुती सरकारला घेरले. ते म्हणाले, "प्रभू रामाचा उल्लेख भाषणात झाला. रामटेकला सांस्कृतिक महोत्सव करणार आहेत. पण, असं म्हटलं जातं की, 'रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए.' विधानसभेच्या निवडणुकीआधी जी वचनं आपण महाराष्ट्राला दिली. माझ्याकडे मोठा गठ्ठा आहे. त्यात संकल्प पत्र २०२४चा. त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही", असे म्हणत जयंत पाटलांनी सरकारला कोंडीत पकडले. 

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कशी होणार? पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

"कोरोना काळात शिवभोजन थाळीने लोकांना आधार दिला. ती थाळी बंद होऊ नये, एवढी अपेक्षा करतो. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याचे मुख्यमंत्री सतत सांगतात. त्यासाठी आपल्या राज्याच्या विकास वाढीचा दर १४-१५ टक्क्यांवर गेला पाहिजे. मागच्या वेळी तो, ८ टक्के होता, तो आता ७.३ टक्के खाली आला. त्यामुळे ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी होणार आणि कधी होणार?", असा सवालही जयंत पाटलांनी केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार