शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

२०२४ मध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम होणार, केवळ ४० ते ५० जागा मिळणार, जयंत पाटलांनी थेट आकडाच सांगितला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:06 IST

Jayant News: २०२४ मध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार, तसेच महाविकास आघाडी एकजुटीने लढल्यास भाजपाला केवळ ४० ते ५० जागा मिळणार असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदीही रंगत आहे. दरम्यान, २०२४ मध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार, तसेच महाविकास आघाडी एकजुटीने लढल्यास भाजपाला केवळ ४० ते ५० जागा मिळणार असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी भाजपाबाबत प्रतिक्रिया दिली. तेव्हा ते म्हणाले की, २०२४ पर्यंत देशात वेगवेगळे अनुभव येतील  याची मला खात्री आहे. त्यामुळे २०२४ मध्ये देशातील चित्र बदलेल. तसेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी संघटीतपणे लढली तर भाजपा ४०-५० जागांपेक्षा जास्त जागांवर निवडून येणार नाही, अशी आकडेवारी सांगते, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव, तर भाजपाकडून सत्यजित कदम हे उमेदवार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून, १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपा