शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:30 IST

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केलीय का, त्यातले किती जगले, किती पैसे खर्च झाले. गैरव्यवहार झालाय का अशाप्रकारे विविध आरोपांवर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

मुंबई – विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून यावेळी सत्ताधारी-विरोधक वृक्ष लागवड योजनेवरून आमनेसामने आले. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केल्याचा दावा भाजपा सरकारने याआधी केला होता. त्याबाबत मविआ काळात चौकशी समिती नेमली होती. आज या समितीतील सदस्य संख्या वाढवावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी हा चौकशी अहवाल पुढील अधिवेशनात पहिल्या आठवड्यात मांडावा अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावेळी जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला घेरलं. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उत्तरांनी सर्वच हसले.

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केलीय का, त्यातले किती जगले, किती पैसे खर्च झाले. गैरव्यवहार झालाय का अशाप्रकारे विविध आरोपांवर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. याचा अहवाल पुढील अधिवेशनात शेवटच्या दिवशी मांडला जाईल असं विधिमंडळात ठरवले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मागील वेळी या चौकशी अहवालाला मुदतवाढ दिली होती. यंदा पुन्हा नवीन सदस्य समितीत घेतले. पुढील अधिवेशनात हा अहवाल पहिल्या दिवशी मांडावा. नवीन झालेल्या उपमुख्यमंत्र्यांनीही हा अहवाल लवकर यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांनाही या अहवालात नक्की काय आहे याबाबत उत्सुकता आहे असा चिमटा अजित पवारांना काढला.

त्याशिवाय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अहवाल सादर करण्यापेक्षा पहिल्या दिवशी करावा अशी मागणी केली परंतु पहिल्या दिवशी कामकाजात हे बसत नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यावर पहिला दिवशी नसेल तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी करा पण अहवाल लवकर मांडावा, त्यावर चर्चा व्हायला हवी असं जयंत पाटील यांनी मागणी केली. तर जयंत पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावावर सरकारने मान्यता द्यावी. मुद्दाम या अहवालावर चर्चा होऊ नये असा सरकारचा उद्देश आहे का? पुढील अधिवेशनात हा अहवाल पहिल्या दिवशी येऊ द्या. चर्चा होऊ द्या ना.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी त्यांचा मुद्दा मांडताना माझा उल्लेख केला. मीपण विरोधी पक्षात असताना हा अहवाल लवकर यावा असं म्हटलं होते. परंतु ज्यावेळी आपण विरोधी बाकांवर बसतो तेव्हा विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि सत्ताधारी पक्षात बसल्यानंतर, वेगळी माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे आता १७ सदस्यांची समिती २१ सदस्यांची केलीय. ४ लोकं वाढल्यावर काय होणार असं जयंत पाटील म्हणतात पण लोकं वाढल्यावर काय होणार हे मला चांगले माहितीये असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटल्यावर सभागृहात हशा पिकला. त्यामुळे मी त्या खोलात जात नाही. नैसर्गिक संकटे, अतिवृष्टी येते. कधी असे प्रसंग येतात त्यामुळे अहवाल यायला विलंब लागतो. जयंत पाटलांच्या मताचा आदर करतो पण सर्वोच्च पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष जो काही निर्णय देतील त्याची अंमलबजावणी सरकार करेल असा विश्वास अजित पवारांनी विधानसभेत दिला.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

सभागृहात एखाद्या विषयात चर्चा करताना नियमांमध्ये करतो. सरकारकडून जो प्रस्ताव मांडला त्याबाह्य चर्चा करणे योग्य नाही. सभागृहाने जो निर्णय घेतला तो मान्य करावा हवा. आपण केवळ समिती सदस्यांच्या संख्येबद्दल, अध्यक्षांबद्दल निर्णय घेऊया असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांची मागणी नाकारली.

टॅग्स :Maharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण