शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
8
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
9
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
10
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
12
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
13
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
14
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
15
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
16
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
17
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
18
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
19
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
20
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:30 IST

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केलीय का, त्यातले किती जगले, किती पैसे खर्च झाले. गैरव्यवहार झालाय का अशाप्रकारे विविध आरोपांवर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

मुंबई – विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून यावेळी सत्ताधारी-विरोधक वृक्ष लागवड योजनेवरून आमनेसामने आले. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केल्याचा दावा भाजपा सरकारने याआधी केला होता. त्याबाबत मविआ काळात चौकशी समिती नेमली होती. आज या समितीतील सदस्य संख्या वाढवावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी हा चौकशी अहवाल पुढील अधिवेशनात पहिल्या आठवड्यात मांडावा अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावेळी जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला घेरलं. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उत्तरांनी सर्वच हसले.

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केलीय का, त्यातले किती जगले, किती पैसे खर्च झाले. गैरव्यवहार झालाय का अशाप्रकारे विविध आरोपांवर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. याचा अहवाल पुढील अधिवेशनात शेवटच्या दिवशी मांडला जाईल असं विधिमंडळात ठरवले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मागील वेळी या चौकशी अहवालाला मुदतवाढ दिली होती. यंदा पुन्हा नवीन सदस्य समितीत घेतले. पुढील अधिवेशनात हा अहवाल पहिल्या दिवशी मांडावा. नवीन झालेल्या उपमुख्यमंत्र्यांनीही हा अहवाल लवकर यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांनाही या अहवालात नक्की काय आहे याबाबत उत्सुकता आहे असा चिमटा अजित पवारांना काढला.

त्याशिवाय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अहवाल सादर करण्यापेक्षा पहिल्या दिवशी करावा अशी मागणी केली परंतु पहिल्या दिवशी कामकाजात हे बसत नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यावर पहिला दिवशी नसेल तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी करा पण अहवाल लवकर मांडावा, त्यावर चर्चा व्हायला हवी असं जयंत पाटील यांनी मागणी केली. तर जयंत पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावावर सरकारने मान्यता द्यावी. मुद्दाम या अहवालावर चर्चा होऊ नये असा सरकारचा उद्देश आहे का? पुढील अधिवेशनात हा अहवाल पहिल्या दिवशी येऊ द्या. चर्चा होऊ द्या ना.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी त्यांचा मुद्दा मांडताना माझा उल्लेख केला. मीपण विरोधी पक्षात असताना हा अहवाल लवकर यावा असं म्हटलं होते. परंतु ज्यावेळी आपण विरोधी बाकांवर बसतो तेव्हा विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि सत्ताधारी पक्षात बसल्यानंतर, वेगळी माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे आता १७ सदस्यांची समिती २१ सदस्यांची केलीय. ४ लोकं वाढल्यावर काय होणार असं जयंत पाटील म्हणतात पण लोकं वाढल्यावर काय होणार हे मला चांगले माहितीये असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटल्यावर सभागृहात हशा पिकला. त्यामुळे मी त्या खोलात जात नाही. नैसर्गिक संकटे, अतिवृष्टी येते. कधी असे प्रसंग येतात त्यामुळे अहवाल यायला विलंब लागतो. जयंत पाटलांच्या मताचा आदर करतो पण सर्वोच्च पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष जो काही निर्णय देतील त्याची अंमलबजावणी सरकार करेल असा विश्वास अजित पवारांनी विधानसभेत दिला.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

सभागृहात एखाद्या विषयात चर्चा करताना नियमांमध्ये करतो. सरकारकडून जो प्रस्ताव मांडला त्याबाह्य चर्चा करणे योग्य नाही. सभागृहाने जो निर्णय घेतला तो मान्य करावा हवा. आपण केवळ समिती सदस्यांच्या संख्येबद्दल, अध्यक्षांबद्दल निर्णय घेऊया असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांची मागणी नाकारली.

टॅग्स :Maharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण