शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:30 IST

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केलीय का, त्यातले किती जगले, किती पैसे खर्च झाले. गैरव्यवहार झालाय का अशाप्रकारे विविध आरोपांवर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

मुंबई – विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून यावेळी सत्ताधारी-विरोधक वृक्ष लागवड योजनेवरून आमनेसामने आले. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केल्याचा दावा भाजपा सरकारने याआधी केला होता. त्याबाबत मविआ काळात चौकशी समिती नेमली होती. आज या समितीतील सदस्य संख्या वाढवावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी हा चौकशी अहवाल पुढील अधिवेशनात पहिल्या आठवड्यात मांडावा अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावेळी जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला घेरलं. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उत्तरांनी सर्वच हसले.

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केलीय का, त्यातले किती जगले, किती पैसे खर्च झाले. गैरव्यवहार झालाय का अशाप्रकारे विविध आरोपांवर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. याचा अहवाल पुढील अधिवेशनात शेवटच्या दिवशी मांडला जाईल असं विधिमंडळात ठरवले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मागील वेळी या चौकशी अहवालाला मुदतवाढ दिली होती. यंदा पुन्हा नवीन सदस्य समितीत घेतले. पुढील अधिवेशनात हा अहवाल पहिल्या दिवशी मांडावा. नवीन झालेल्या उपमुख्यमंत्र्यांनीही हा अहवाल लवकर यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांनाही या अहवालात नक्की काय आहे याबाबत उत्सुकता आहे असा चिमटा अजित पवारांना काढला.

त्याशिवाय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अहवाल सादर करण्यापेक्षा पहिल्या दिवशी करावा अशी मागणी केली परंतु पहिल्या दिवशी कामकाजात हे बसत नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यावर पहिला दिवशी नसेल तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी करा पण अहवाल लवकर मांडावा, त्यावर चर्चा व्हायला हवी असं जयंत पाटील यांनी मागणी केली. तर जयंत पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावावर सरकारने मान्यता द्यावी. मुद्दाम या अहवालावर चर्चा होऊ नये असा सरकारचा उद्देश आहे का? पुढील अधिवेशनात हा अहवाल पहिल्या दिवशी येऊ द्या. चर्चा होऊ द्या ना.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी त्यांचा मुद्दा मांडताना माझा उल्लेख केला. मीपण विरोधी पक्षात असताना हा अहवाल लवकर यावा असं म्हटलं होते. परंतु ज्यावेळी आपण विरोधी बाकांवर बसतो तेव्हा विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि सत्ताधारी पक्षात बसल्यानंतर, वेगळी माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे आता १७ सदस्यांची समिती २१ सदस्यांची केलीय. ४ लोकं वाढल्यावर काय होणार असं जयंत पाटील म्हणतात पण लोकं वाढल्यावर काय होणार हे मला चांगले माहितीये असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटल्यावर सभागृहात हशा पिकला. त्यामुळे मी त्या खोलात जात नाही. नैसर्गिक संकटे, अतिवृष्टी येते. कधी असे प्रसंग येतात त्यामुळे अहवाल यायला विलंब लागतो. जयंत पाटलांच्या मताचा आदर करतो पण सर्वोच्च पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष जो काही निर्णय देतील त्याची अंमलबजावणी सरकार करेल असा विश्वास अजित पवारांनी विधानसभेत दिला.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

सभागृहात एखाद्या विषयात चर्चा करताना नियमांमध्ये करतो. सरकारकडून जो प्रस्ताव मांडला त्याबाह्य चर्चा करणे योग्य नाही. सभागृहाने जो निर्णय घेतला तो मान्य करावा हवा. आपण केवळ समिती सदस्यांच्या संख्येबद्दल, अध्यक्षांबद्दल निर्णय घेऊया असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांची मागणी नाकारली.

टॅग्स :Maharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण