शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:44 IST

Jayant Patil Mahayuti: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महायुती सरकारला काही प्रश्न विचारत घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सोयाबीनला ६ रुपयांचा हमीभाव देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचा मुद्द्यावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महायुती सरकारला काही सवाल केले आहेत. 'भाजप महायुतीला झटका देण्यास बळीराजा सज्ज असल्याने सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झाली आहे', असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला आहे.   

सोयाबीनला ६ हजार रुपयांचा हमीभाव देण्याची आश्वासन मोदींनी दिल्याची बातमी पोस्ट करत जयंत पाटील यांनी महायुतीला लक्ष्य केले. 

"भाजप महायुती सरकारच्या पायाखालची जमीन सरकली की त्यांना शेतकरी आठवतो, लाडकी बहिण आठवते. लोकसभेत झटका दिल्यानंतर आता विधानसभेतही भाजप महायुतीला झटका देण्यास बळीराजा सज्ज असल्याने सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झाली आहे. पराभवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भाजप महायुतीला आमचे काही सवाल आहेत", असे म्हणत जयंत पाटलांनी सवाल केले आहेत.

जयंत पाटलांनी महायुतीला कोणते प्रश्न विचारलेत?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे तर  ७.५ वर्षे राज्यात भाजपचे सरकार आहे तरी यांना राज्यातील शेतकऱ्यांना योग्य हमीभाव का देता आला नाही?", असा प्रश्न जयंत पाटलांनी उपस्थित केला.  

"सोयाबीनचा उत्पादन खर्च ५ हजार रुपयांच्यावर मग शेतकऱ्यांना फक्त ३२०० रुपये का मिळत आहेत? कापसाला ११ हजारांपर्यंत भाव मिळायचा तो आता ६-६.५ हजारांवर का आला? आमचा महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन करतो तरी आमच्या शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून, सरकारच्या 'लाडक्या' उद्योगपतींच्या सोयीसाठी सोयाबीन सारख्या तेल बियांची आयात का केली जाते?", असेही जयंत पाटलांनी म्हटले आहे.  

जीएसटी का आकारला जातोय?

"भाजप महायुती सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे म्हणता मग शेतकऱ्यांच्या बी-बियाणांवर, खतांवर, औषधांवर इतक्या मोठ्या प्रमाणात जीएसटी का आकारला जातोय ? महागाई का कमी केली जात नाही?", असा सवाल जयंत पाटलांनी महायुतीला केला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीJayant Patilजयंत पाटील