शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची सहाव्या क्रमांकवर घसरण; जयंत पाटील म्हणाले, "गुजरातसुद्धा पुढे गेलं पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:43 IST

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची सहाव्या स्थानी घसरण झाल्यामुळे शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 :महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर केला. या अहवालावरुन दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या स्थानी घसरला असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेलाय. दोन महिन्यानंतर आम्हाला या अर्थसंकल्पाची दुरुस्ती करावी लागणार आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आहे. फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी सरकारने राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला नव्हता. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्याआधी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. अहवालानुसार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सहाव्या स्थानावर गेला आहे.

या अहवालानुसार महाराष्ट्राचं २०२३-२४ मध्ये दरडोई उत्पन्न २,७७,६०३ रुपये इतके अपेक्षित असून २०२२-२३ मध्ये ते २,५२,३८९ रुपये इतके होते. तसेच २०२३-२४ मध्ये देशाचं दरडोई उत्पन्न १,८३,२३६ रुपये असून गेल्या वर्षी ते १,६९,४९६ रुपये इतके होते. २०२२-२३ मध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तेलंगणा राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, गुजरात ही राज्ये असून महाराष्ट्र याबाबतीत सहाव्या क्रमांकावर गेला आहे. यावरुनच आता शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  "आर्थिक पाहणी अहवाल आज प्रकाशित करण्यात आला. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राचा क्रमांक सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवण्यात आला आहे. आपल्यापेक्षा कर्नाटक, हरियाणा, तमिळनाडू आणि गुजरात ही राज्ये पुढे गेली आहेत. महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पहिल्या क्रमांकाचे राज्य होते. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेलाय. महाराष्ट्र सरकार चालवणाऱ्यांना या आकडेवारीतून महाराष्ट्राची अधोगती त्यांच्या काळात किती झाली हे त्यांना कळलं असेल," असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्राचा एकंदरीत विचार करता पिकांच्या  विभागात १.५ टक्के घट होऊ शकते. तर,मासेमारी व जलसंवर्धनात २.९ टक्के आणि वनसंवर्धनात ९.२ टक्के वाढ अपेक्षित आहे. बांधकामात ६.२ टक्के, उद्योग क्षेत्रात ७.६ टक्के, वस्तू निर्मिती क्षेत्रात ७.५ टक्के, राज्याच्या व्यापार, दुरुस्ती, हॉटेल्स व उपहारगृहे, वाहतूक, साठवण व दळणवळण, तसेच प्रसारणाशी संबंधित सेवा क्षेत्रांत ६.६ टक्के, वित्तीय, स्थावर मालमत्ता व व्यावसायिक सेवांमध्ये १०.१ टक्के वाढ अपेक्षित आहे, सार्वजनिक प्रशासन, सुरक्षा व इतर सेवांमध्ये ७.६ टक्के, तर सेवा क्षेत्रात ८.८ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे या पाहणी अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाJayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्रBudgetअर्थसंकल्प 2024Ajit Pawarअजित पवार