शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव, पक्षचिन्ह मिळणार? जयंत पाटील म्हणाले, “आम्ही नव्याने...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 13:48 IST

NCP Jayant Patil: जयंत पाटील यांच्या विधानामुळे पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव शरद पवार यांच्या हातातून जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

NCP Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केली. सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट आणि शरद पवार गटाला नोटीस बजावली होती. यासंदर्भात दोन्ही गटाकडून तर्क-वितर्क केले जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत, तेव्हापासून जयंत पाटील शरद पवार यांच्यासोबत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला मिळणार असल्याचा दावा केला होता. लोकांच्या मनात शंका आहे की, राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. त्यामुळे सर्वांना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून निकाल येईल. हा निकाल शंभर टक्के अजितदादांच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांकडेच राहणार आहे. अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. यानंतर आता जयंत पाटील यांनीही अशाच प्रकारचे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव, पक्षचिन्ह मिळणार?

शरद पवारांचे विश्वासू मानले गेलेले जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेप्रमाणेच आमचेही पक्षचिन्ह जाईल. जे शिवसेनेच्या बाबतीत घडले, तेच राष्ट्रवादीच्या बाबत घडले तर वावगे नाही. आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह जाईल, असे वाटत आहे. दुसऱ्यांना ते देऊन परत शिवसेनेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. असे जर झाल्यास आम्ही शिवसेनेसारखा परत नव्याने आम्ही संघर्ष करू, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्याप्रमाणेच आम्हीच राष्ट्रवादी आहोत, असा दावा केला आहे. तसेच आपल्याला सर्वात जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, अद्याप नेमका आकडा समजू शकलेला नाही. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे सुनावणी घेतल्यास शिवसेना पक्षाप्रमाणेच निवडणूक आयोग अनेक बाबी तपासू शकते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खरा अधिकार कुणाचा आहे, याचा निकाल देऊ शकते, असे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस