शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

जालना जिल्हा शिवसेनामुक्त; दोनही उमेदवार पराभूत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 15:56 IST

शिवसेना जालना जिल्ह्यात एकेकाळी मजबूत स्थितीत होती. परंतु, तीनपैकी मिळालेल्या दोन जागांवरही पराभव झाल्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने जालना शिवसेनामुक्त झाला असंच म्हणावं लागत आहे. तर भाजपने आपल्या तीनही अर्थात भोकरदन, परतूर आणि बदनापूरची जागा कायम राखल्या आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या अनेक जागा कमी झाल्या. अबकी बार 220 पारचा नारा देणाऱ्या युतीला 170 च्या आतच समाधान मानावे लागले. भाजप आणि शिवसेनेची अनेक जिल्ह्यात पिछेहट झाली आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी आघाडीने भाजप-शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला आहे. तर जालना जिल्हा शिवसेना मुक्त झाला आहे.

मराठवाडा हा शिवसेनेचा गड मानला जातो. मराठवाड्यात शिवसेनेचे प्रस्त मजबूत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपासून या गडाला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभेला औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे पराभूत झाले. त्यानंतर विधानसभेला औरंगाबादेतून शिवसेनेने विधानसभेला जास्त नुकसान होऊ न देता कन्नडची जागा आपल्याकडे मिळवली. मात्र जालन्यातून शिवसेनेची पिछेहट झाली आहे.

आधीच शिवसेनेला जालना जिल्ह्यात तीनऐवजी दोनच जागा वाट्याला आल्या. हट्ट करूनही बदनापूरची जागा भाजपने आपल्याकडे ठेवली. त्यानंतर जालना आणि घनसावंगीची जागा शिवसेनेला मिळाली. या दोन्ही जागांवर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. घनसावंगीतून हिकमत उढाण तर जालन्यातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना पराभव पत्करावा लागला.

शिवसेना जालना जिल्ह्यात एकेकाळी मजबूत स्थितीत होती. परंतु, तीनपैकी मिळालेल्या दोन जागांवरही पराभव झाल्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने जालना शिवसेनामुक्त झाला असंच म्हणावं लागत आहे. तर भाजपने आपल्या तीनही अर्थात भोकरदन, परतूर आणि बदनापूरची जागा कायम राखल्या आहेत.