शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

जालना जिल्हा शिवसेनामुक्त; दोनही उमेदवार पराभूत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 15:56 IST

शिवसेना जालना जिल्ह्यात एकेकाळी मजबूत स्थितीत होती. परंतु, तीनपैकी मिळालेल्या दोन जागांवरही पराभव झाल्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने जालना शिवसेनामुक्त झाला असंच म्हणावं लागत आहे. तर भाजपने आपल्या तीनही अर्थात भोकरदन, परतूर आणि बदनापूरची जागा कायम राखल्या आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या अनेक जागा कमी झाल्या. अबकी बार 220 पारचा नारा देणाऱ्या युतीला 170 च्या आतच समाधान मानावे लागले. भाजप आणि शिवसेनेची अनेक जिल्ह्यात पिछेहट झाली आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी आघाडीने भाजप-शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला आहे. तर जालना जिल्हा शिवसेना मुक्त झाला आहे.

मराठवाडा हा शिवसेनेचा गड मानला जातो. मराठवाड्यात शिवसेनेचे प्रस्त मजबूत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपासून या गडाला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभेला औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे पराभूत झाले. त्यानंतर विधानसभेला औरंगाबादेतून शिवसेनेने विधानसभेला जास्त नुकसान होऊ न देता कन्नडची जागा आपल्याकडे मिळवली. मात्र जालन्यातून शिवसेनेची पिछेहट झाली आहे.

आधीच शिवसेनेला जालना जिल्ह्यात तीनऐवजी दोनच जागा वाट्याला आल्या. हट्ट करूनही बदनापूरची जागा भाजपने आपल्याकडे ठेवली. त्यानंतर जालना आणि घनसावंगीची जागा शिवसेनेला मिळाली. या दोन्ही जागांवर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. घनसावंगीतून हिकमत उढाण तर जालन्यातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना पराभव पत्करावा लागला.

शिवसेना जालना जिल्ह्यात एकेकाळी मजबूत स्थितीत होती. परंतु, तीनपैकी मिळालेल्या दोन जागांवरही पराभव झाल्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने जालना शिवसेनामुक्त झाला असंच म्हणावं लागत आहे. तर भाजपने आपल्या तीनही अर्थात भोकरदन, परतूर आणि बदनापूरची जागा कायम राखल्या आहेत.