शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:04 IST

Jalgaon Crime News: २१ व्या शतकातील २५ वर्ष संपत आली तरी आपल्याकडील अनेक भागात अजूनही अनेक बुसरटलेल्या रुढी परंपरा पाळल्या जातात. मासिक पाळीबाबत पाळल्या जाणाऱ्या अशाच विटाळातून एका विवाहितेचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२१ व्या शतकातील २५ वर्ष संपत आली तरी आपल्याकडील अनेक भागात अजूनही अनेक बुसरटलेल्या रुढी परंपरा पाळल्या जातात. मासिक पाळीबाबत पाळल्या जाणाऱ्या अशाच विटाळातून एका विवाहितेचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील किनोद या गावात गायत्री कोळी या २६ वर्षीय विवाहितेने गुरुवारी गळफास घेऊन जीवन संपलं होतं. मात्र या महिलेची तिची सासू आणि नणंदेने मिळून हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गायत्र कोळी ही महिला किनोद या गावात पती आणि सासू आणि दोन मुलांसर वास्तव्यास होती. तिच्या पतीचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. तर गायत्री शिवणकाम करत असे. दरम्यान,  गुरुवारी दुपारच्या सुमारास गायत्री हिने गळफास घेतल्याची माहिती तिच्या माहेरच्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी गायत्रीच्या घरी धाव घेतली. मात्र गायत्री हिने जीवन संपवलं नसूत तिची हत्या झाल्याच्या दावा माहेरच्या नातेवाईकांनी केला.

याबाबत गायत्री हिचा भाऊ सागर कोळी याने धक्कादायक माहिती दिली. गायत्री हिने मासिक पाळी आली असताना जेवण केलं होतं. मात्र गायत्रीच्या सासूसह इतरांना असं जेवण चालत नव्हतं. त्यावरून कुटुंबामध्ये वाद झाला. हा वाद वाढून अखेर गायत्रीची सासू आणि नणंदेने तिला मारहाण केली. तसेच तिची गळा आवळून हत्या केली. तसेच हत्या केल्यानंतर ही आत्महत्या भासावी यासाठी तिचा मृतदेह गळ्याभोवती साडीचा फास लावून लटकवून ठेवला, असा आरोपही त्याने केला.

ही घटना घडल्यानंतर मृत गायत्री हिचा पती, सासू आणि नणंद फरार झाले आहेत. आता दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गायत्री हिच्या नातेवाईकांनी घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावDomestic Violenceघरगुती हिंसा