शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

यंदा पडणार नाही कडाक्याची थंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 06:35 IST

तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ आणि उष्णतेच्या लाटांमुळे या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नाही, असा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे.

- सचिन लुंगसेमुंबई : तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ आणि उष्णतेच्या लाटांमुळे या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नाही, असा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे. ‘एल निनो’सह उर्वरित घटकांचा वातावरणावर प्रभाव जाणवत असून, उष्ण वर्षांत सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यंदा भारतात हिवाळा सौम्य राहील. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, एल निनोचा प्रभाव यास कारणीभूत असेल. मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला भारतीय हवामान शास्त्र विभाग हवामानाचा सत्रनिहाय अंदाज वर्तवित असून, त्यात सुधारणा करत आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कोलकातासारख्या मोठ्या शहरांना पुराबाबत सावध करण्यासाठीही हवामान विभाग कार्यरत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. आता आणखी एक धोरण तयार होत असून, ते महिनाभरात तयार होईल. हवामानासंदर्भातील व्यावसायिक वापरासाठीच्या उत्पादनांवरही भर दिला जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.२०१८ साली वातावरणात मोठी स्थित्यंतरे झाली. त्यामुळेच २०१८ हे वर्ष १९०१ पासून सहावे उष्ण वर्ष म्हणून नोंदविण्यात आले आहे. यापूर्वी २०१७, २०१६, २०१५, २०१० आणि २००९ या पाच वर्षांची नोंद उष्ण वर्ष म्हणून झाली आहे. २०१८ या वर्षी देशभरात घडलेल्या आपत्कालीन घटनांमुळे तब्बल १ हजार ४२८ जणांचे बळी गेले होते. तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ तसेच उष्णतेच्या लाटांचा परिणाम म्हणूनच या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नसल्याचा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे.२०१९ हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्षग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भरच पडत आहे. १९९८ सालापासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे आता दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे.१९९८ सालासह २००५, २००९, २०१०, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८ या वर्षांची ‘उष्ण वर्ष’ म्हणून नोंद झाली आहे. गेल्या शंभर वर्षांचा आढावा घेतल्यास २००९, २०१० व २०१६ या तीन वर्षांत सर्वाधिक तापमान वाढ नोंदविण्यात आली होती.जागतिक तापमान वाढीसाठी कर्ब वायूंपैकी ७० टक्के कारणीभूत असणारा वायू म्हणजे कार्बन डायआॅक्साईड. दुसरा मिथेन आणि तिसरा नायट्रस आॅक्साइड.उस्मानाबाद येथे सर्वांत कमी किमान तापमानराज्यात सर्वांत कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १२.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन