शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

यंदा पडणार नाही कडाक्याची थंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 06:35 IST

तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ आणि उष्णतेच्या लाटांमुळे या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नाही, असा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे.

- सचिन लुंगसेमुंबई : तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ आणि उष्णतेच्या लाटांमुळे या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नाही, असा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे. ‘एल निनो’सह उर्वरित घटकांचा वातावरणावर प्रभाव जाणवत असून, उष्ण वर्षांत सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यंदा भारतात हिवाळा सौम्य राहील. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, एल निनोचा प्रभाव यास कारणीभूत असेल. मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला भारतीय हवामान शास्त्र विभाग हवामानाचा सत्रनिहाय अंदाज वर्तवित असून, त्यात सुधारणा करत आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कोलकातासारख्या मोठ्या शहरांना पुराबाबत सावध करण्यासाठीही हवामान विभाग कार्यरत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. आता आणखी एक धोरण तयार होत असून, ते महिनाभरात तयार होईल. हवामानासंदर्भातील व्यावसायिक वापरासाठीच्या उत्पादनांवरही भर दिला जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.२०१८ साली वातावरणात मोठी स्थित्यंतरे झाली. त्यामुळेच २०१८ हे वर्ष १९०१ पासून सहावे उष्ण वर्ष म्हणून नोंदविण्यात आले आहे. यापूर्वी २०१७, २०१६, २०१५, २०१० आणि २००९ या पाच वर्षांची नोंद उष्ण वर्ष म्हणून झाली आहे. २०१८ या वर्षी देशभरात घडलेल्या आपत्कालीन घटनांमुळे तब्बल १ हजार ४२८ जणांचे बळी गेले होते. तापमानात सातत्याने नोंदविण्यात येत असलेली वाढ तसेच उष्णतेच्या लाटांचा परिणाम म्हणूनच या वर्षी तीव्र स्वरूपाच्या थंडीची नोंद होणार नसल्याचा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वर्तविला आहे.२०१९ हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्षग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भरच पडत आहे. १९९८ सालापासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे आता दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे.१९९८ सालासह २००५, २००९, २०१०, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८ या वर्षांची ‘उष्ण वर्ष’ म्हणून नोंद झाली आहे. गेल्या शंभर वर्षांचा आढावा घेतल्यास २००९, २०१० व २०१६ या तीन वर्षांत सर्वाधिक तापमान वाढ नोंदविण्यात आली होती.जागतिक तापमान वाढीसाठी कर्ब वायूंपैकी ७० टक्के कारणीभूत असणारा वायू म्हणजे कार्बन डायआॅक्साईड. दुसरा मिथेन आणि तिसरा नायट्रस आॅक्साइड.उस्मानाबाद येथे सर्वांत कमी किमान तापमानराज्यात सर्वांत कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १२.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन