शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

पहिल्याच दिवशी जरांगेंनी शरद पवारांवर टीका केली असती, तर...; नितेश राणेंचा मराठा आंदोलनाच्या नेत्याला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:24 IST

Nitesh Rane: मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही, त्यांनी राजकीय भाष्य टाळणे त्यांच्यासाठी चांगले आहे. - नितेश राणे

महाराष्ट्र द्वेषाचा ठेका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. एकदाचे पॅकअप करून त्यांना कायमचे लंडनला पाठवण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांना मोलाचा सल्लाही दिला आहे.

अकोल्यात हिंदू बाहुबली संमेलनासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत मांडले. पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समाजातील लव्ह जिहादचे विषय आल्यास 10 ते 15 दिवस केस दाखल करत नाहीत. मुलीच्या आई वडिलांसोबत गैरव्यवहार करत आहेत. या अधिकाऱ्यांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होते, अशा सडक्या आंब्यांना मी इशारा दिलेला आहे, असे राणे म्हणाले. 

आमदारांना म्हाडा घराची लॉटरी बाबत बोलताना त्यांनी अशी काही उदाहरणं असतील तर संबंधित आमदारांनी भूमिका जाहीर करावी, काही सामान्य घरातील व्यक्ती आमदार होतात, पण सगळेच आमदार आर्थिक सक्षम नसतात, असे राणे म्हणाले. 

बहीणीविरोधात बायकोला निवडणुकीला उभे करायला नको होते, असे वक्तव्य अजित पवार यांनी नुकतेच केले होते. यावर विचारले असता नितेश राणे म्हणाले की, अजित पवार अनुभवी नेते आहेत. कुठल्यातरी अनुभवाणे हे मत व्यक्त केले असेल. त्यामुळे महायुतीवर काही परिणाम होणार होईल असे इमले बांधणे चुकीचे आहे. एका वक्तव्याने महायुतीच्या बाहेर पडतील असे काही नाही, असे राणे म्हणाले. 

मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही, त्यांनी राजकीय भाष्य टाळणे त्यांच्यासाठी चांगले आहे. ते मराठा आरक्षणाविषयी बोलतील तेवढे त्यांच्या हिताचे आहे. सर्वच नेत्यांची स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असल्यास त्यावर जरांगे यांनी भूमिका जाहीर करावी. शरद पवारांवर टीकेची जरांगे यांनी पहिल्या दिवशी अशी भूमिका घेतली असती ना तर लोकांना विश्वास बसला असता. आता चारही दरवाजे बंद झाले आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे