शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं- राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 22:55 IST

मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

औरंगाबाद- मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच औरंगाबाद येथे घडवून आणलेल्या दंगलीशी मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही, या मोर्चात मराठा क्रांती मोर्चाची मुले नव्हती, असे राज यांनी म्हटले आहे. तसेच या दंगलीतील घडवून आणलेल्या हिंसाचारात परप्रांतीयांचा सहभाग असल्याचेही राज यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यामध्ये नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद येथे जाळपोळीच्या घटनाही घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. तर औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीमध्ये जवळपास 60 कंपन्यांना आग लावण्यात आली होती. तेथील साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली होती. याबाबत राज ठाकरेंना पत्रकारांनी विचारणा केली असता, राज ठाकरेंनी हे उत्तर दिलं. त्यावेळी बोलताना मराठा समाजातील मुलांना राज यांनी क्लीन चिट दिली. तसेच मराठा मोर्चावेळी वाळूज औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांनी तोडफोड केली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. याचा अर्थ काय तर परप्रांतीय लोक आपल्या राज्यात येऊन रोजगार मिळवतात आणि अशा प्रकारे आपल्या शहराचे नुकसान करतात, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.या तोडफोडीत मराठा क्रांती मोर्चाचे तरुण नव्हते. मात्र मराठा क्रांती मोर्चाला नेतृत्व नसल्याने हे आंदोलन बदनाम झाल्याची खंतही राज यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून सुरू असलेल्या राजकारणावर राज यांनी प्रकाश टाकला. नाशिक महापालिकेची सत्ता माझ्याकडे असताना अडीच वर्षे पालिकेला आयुक्तपद नव्हते. राजकारण करून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न तेथील राजकीय पक्षांनी केला. मात्र आम्ही आयुक्तांविनाही महापालिका उत्तम चालवली. शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. पण सेना-भाजपाच्या नगरसेवकांना कामच करायची नसतील. तर आयुक्त असले काय आणि नसले काय, काय फरक पडतो, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे