शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं- राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 22:55 IST

मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

औरंगाबाद- मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच औरंगाबाद येथे घडवून आणलेल्या दंगलीशी मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही, या मोर्चात मराठा क्रांती मोर्चाची मुले नव्हती, असे राज यांनी म्हटले आहे. तसेच या दंगलीतील घडवून आणलेल्या हिंसाचारात परप्रांतीयांचा सहभाग असल्याचेही राज यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यामध्ये नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद येथे जाळपोळीच्या घटनाही घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. तर औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीमध्ये जवळपास 60 कंपन्यांना आग लावण्यात आली होती. तेथील साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली होती. याबाबत राज ठाकरेंना पत्रकारांनी विचारणा केली असता, राज ठाकरेंनी हे उत्तर दिलं. त्यावेळी बोलताना मराठा समाजातील मुलांना राज यांनी क्लीन चिट दिली. तसेच मराठा मोर्चावेळी वाळूज औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांनी तोडफोड केली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. याचा अर्थ काय तर परप्रांतीय लोक आपल्या राज्यात येऊन रोजगार मिळवतात आणि अशा प्रकारे आपल्या शहराचे नुकसान करतात, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.या तोडफोडीत मराठा क्रांती मोर्चाचे तरुण नव्हते. मात्र मराठा क्रांती मोर्चाला नेतृत्व नसल्याने हे आंदोलन बदनाम झाल्याची खंतही राज यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून सुरू असलेल्या राजकारणावर राज यांनी प्रकाश टाकला. नाशिक महापालिकेची सत्ता माझ्याकडे असताना अडीच वर्षे पालिकेला आयुक्तपद नव्हते. राजकारण करून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न तेथील राजकीय पक्षांनी केला. मात्र आम्ही आयुक्तांविनाही महापालिका उत्तम चालवली. शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. पण सेना-भाजपाच्या नगरसेवकांना कामच करायची नसतील. तर आयुक्त असले काय आणि नसले काय, काय फरक पडतो, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे