शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं- राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 22:55 IST

मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

औरंगाबाद- मराठा आंदोलनाला नेतृत्व नसल्यानं ते बदनाम झालं, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच औरंगाबाद येथे घडवून आणलेल्या दंगलीशी मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही, या मोर्चात मराठा क्रांती मोर्चाची मुले नव्हती, असे राज यांनी म्हटले आहे. तसेच या दंगलीतील घडवून आणलेल्या हिंसाचारात परप्रांतीयांचा सहभाग असल्याचेही राज यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यामध्ये नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद येथे जाळपोळीच्या घटनाही घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. तर औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीमध्ये जवळपास 60 कंपन्यांना आग लावण्यात आली होती. तेथील साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली होती. याबाबत राज ठाकरेंना पत्रकारांनी विचारणा केली असता, राज ठाकरेंनी हे उत्तर दिलं. त्यावेळी बोलताना मराठा समाजातील मुलांना राज यांनी क्लीन चिट दिली. तसेच मराठा मोर्चावेळी वाळूज औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांनी तोडफोड केली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. याचा अर्थ काय तर परप्रांतीय लोक आपल्या राज्यात येऊन रोजगार मिळवतात आणि अशा प्रकारे आपल्या शहराचे नुकसान करतात, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.या तोडफोडीत मराठा क्रांती मोर्चाचे तरुण नव्हते. मात्र मराठा क्रांती मोर्चाला नेतृत्व नसल्याने हे आंदोलन बदनाम झाल्याची खंतही राज यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून सुरू असलेल्या राजकारणावर राज यांनी प्रकाश टाकला. नाशिक महापालिकेची सत्ता माझ्याकडे असताना अडीच वर्षे पालिकेला आयुक्तपद नव्हते. राजकारण करून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न तेथील राजकीय पक्षांनी केला. मात्र आम्ही आयुक्तांविनाही महापालिका उत्तम चालवली. शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. पण सेना-भाजपाच्या नगरसेवकांना कामच करायची नसतील. तर आयुक्त असले काय आणि नसले काय, काय फरक पडतो, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे