शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

इंदिरा गांधी - करीम लाला भेटीबद्दल संजय राऊत बोलले ते खरं आहे का?; फडणवीसांचे काँग्रेसला पाच प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 14:08 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट होत असल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देइंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट होत असल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा संजय राऊतांनी केलेल्या खुलाशाच्या आधारावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. करीम लालासारख्या अंडरवर्ल्ड डॉनला भेटण्यासाठी इंदिरा गांधी येत होत्या का?

मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट झाल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा संजय राऊतांनी केलेल्या दाव्याच्या आधारावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस पार्टीचे नवे सहयोगी ज्यांनी काँग्रेस पार्टीबरोबर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांपैकी एक असलेल्या संजय राऊतांनी केलेला खुलासा धक्कादायक आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत. स्वर्गीय इंदिराजी या मुंबईतल्या पायधुणीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायला येत होत्या. यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. काँग्रेस पक्षानं हे खरं आहे का ते सांगावं, असं आव्हानच फडणवीसांनी काँग्रेसला दिलं आहे. करीम लालासारख्या अंडरवर्ल्ड डॉनला भेटण्यासाठी इंदिरा गांधी येत होत्या का?, जर अशा प्रकारची भेट होत होती, तर काँग्रेस पार्टी अशा प्रकारच्या अंडरवर्ल्डच्या भरवशावर निवडणुका जिंकत होती का?, काँग्रेस पार्टीला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होता का?, असे प्रश्न आता देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेस पार्टी अंडरवर्ल्डच्या मसल पॉवरवर या ठिकाणी निवडणुका जिंकत होती का?, अशा अनेक शंका आणि प्रश्न आता उपस्थित झाले असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

इंदिरा गांधींविषयीच्या संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्वाचे मौन

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला

छोटा शकील, दाऊद हे महाराष्ट्रातलं राज्य चालवायचे हे खरंय का?, याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. 1960 ते 1980 या दोन दशकांमध्ये मुंबईच्या पोलीस कमिश्नरची अपॉइंटमेंट अंडरवर्ल्ड करायचा, या खुलाशावरही काँग्रेसनं उत्तर द्यायला हवं. अशाच प्रकारे अंडरवर्ल्डच्या माध्यमातून सीपींची नेमणूक व्हायची, याबद्दल खुलासा केला पाहिजे. हाजी मस्तान आणि अंडरवर्ल्डची लोक मंत्रालयात यायची आणि सेलिब्रिटींसारखं त्यांचं स्वागत केलं जायचं हे खरं आहे का? यावरही काँग्रेसनं स्पष्टीकरण द्यावं.काँग्रेस पक्ष यासंदर्भात खुलासा करणार आहे का?, महाराष्ट्रात जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालं, त्याची सुरुवात त्या काळापासून झाली का?, महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेला याची उत्तरं हवी आहेत. काँग्रेस पार्टी इतकी लालची झाली आहे, की आता त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांवर टीका झाल्यानंतरही त्यांच्याकडून कोणीही अधिकृतरीत्या मोठी व्यक्ती बोलायला तयार नाही. कोणी त्याचा निषेध करायला तयार नाही. त्यासंदर्भात कोणी खुलासा करायला तयार नाही. त्यांची सत्ता त्यांना लखलाभ असो, पण महाराष्ट्र आणि देशाला या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेस