शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी घराशेजारी लस देणे शक्य, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 09:17 IST

आतापर्यंत २५ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. अन्य कोणत्या देशाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले आहे? सरकार हेही (घरोघरी जाऊन लस देणे) करू शकते.

मुंबई : ज्येष्ठ नागरिक, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींना घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी घराशेजारी लस देणे शक्य आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ‘घराशेजारी लसीकरण केंद्रे सुरू करण्यास शक्य आहे,’ अशी माहिती उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.घरोघरी जाऊन लस देण्याच्या मुद्द्यावर तज्ज्ञांच्या समितीने विचार केला. मात्र, घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी ‘घराशेजारी’ लस देणे शक्य आहे आणि हीच योग्य उपाययोजना आहे, असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आतापर्यंत २५ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. अन्य कोणत्या देशाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले आहे? सरकार हेही (घरोघरी जाऊन लस देणे) करू शकते. तुम्हाला तुमचा मार्ग शोधावा लागेल, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ज्येष्ठ नागरिक, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण करण्यात यावे, यासाठी व्यवसायाने वकील असलेल्या धृती कपाडिया व कुणाल तिवारी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्या महिन्यात या याचिकवेरील सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला व तज्ज्ञांच्या समितीला याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत तज्ज्ञांच्या समितीने २५ मे रोजी झालेल्या बैठकीत चर्चा केल्याचे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वृद्ध, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींसाठी मर्यादित सुविधा असल्याचे समितीने मान्य करून अशा व्यक्तींच्या घराजवळ लसीकरण केंद्र असावे, असे समितीलाही वाटते. त्यानुसार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने घराशेजारी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी २७ मे रोजी आदर्श कार्यपद्धतीही आखली आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

समितीने दिलेली कारणे गंभीर नाहीत !केंद्र सरकार व समितीने घेतलेल्या मेहनतीचे आम्ही कौतुक करतो. मात्र, घरोघरी जाऊन लसीकरण का केले जाऊ शकत नाही, याची समितीने दिलेली कारणे फारशी गंभीर नाहीत. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे धोके समितीने सांगितले आहेत, ते लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली तरी निर्माण हाेतात, असे न्यायालयाने म्हटले. मेपर्यंत लस घेतल्यानंतर २५,३०९ लोकांना रिॲक्शन झाली. त्यांपैकी १,१८६ लोकांची प्रकृती गंभीर झाली आणि ४७५ लोकांचा मृत्यू झाला, असे केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी आज, बुधवारपर्यंत तहकूब केली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालय