शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी घराशेजारी लस देणे शक्य, केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 09:17 IST

आतापर्यंत २५ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. अन्य कोणत्या देशाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले आहे? सरकार हेही (घरोघरी जाऊन लस देणे) करू शकते.

मुंबई : ज्येष्ठ नागरिक, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींना घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी घराशेजारी लस देणे शक्य आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ‘घराशेजारी लसीकरण केंद्रे सुरू करण्यास शक्य आहे,’ अशी माहिती उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.घरोघरी जाऊन लस देण्याच्या मुद्द्यावर तज्ज्ञांच्या समितीने विचार केला. मात्र, घरोघरी जाऊन लस देण्याऐवजी ‘घराशेजारी’ लस देणे शक्य आहे आणि हीच योग्य उपाययोजना आहे, असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आतापर्यंत २५ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. अन्य कोणत्या देशाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले आहे? सरकार हेही (घरोघरी जाऊन लस देणे) करू शकते. तुम्हाला तुमचा मार्ग शोधावा लागेल, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ज्येष्ठ नागरिक, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण करण्यात यावे, यासाठी व्यवसायाने वकील असलेल्या धृती कपाडिया व कुणाल तिवारी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्या महिन्यात या याचिकवेरील सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला व तज्ज्ञांच्या समितीला याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत तज्ज्ञांच्या समितीने २५ मे रोजी झालेल्या बैठकीत चर्चा केल्याचे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वृद्ध, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्या व्यक्तींसाठी मर्यादित सुविधा असल्याचे समितीने मान्य करून अशा व्यक्तींच्या घराजवळ लसीकरण केंद्र असावे, असे समितीलाही वाटते. त्यानुसार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने घराशेजारी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी २७ मे रोजी आदर्श कार्यपद्धतीही आखली आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

समितीने दिलेली कारणे गंभीर नाहीत !केंद्र सरकार व समितीने घेतलेल्या मेहनतीचे आम्ही कौतुक करतो. मात्र, घरोघरी जाऊन लसीकरण का केले जाऊ शकत नाही, याची समितीने दिलेली कारणे फारशी गंभीर नाहीत. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे धोके समितीने सांगितले आहेत, ते लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली तरी निर्माण हाेतात, असे न्यायालयाने म्हटले. मेपर्यंत लस घेतल्यानंतर २५,३०९ लोकांना रिॲक्शन झाली. त्यांपैकी १,१८६ लोकांची प्रकृती गंभीर झाली आणि ४७५ लोकांचा मृत्यू झाला, असे केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी आज, बुधवारपर्यंत तहकूब केली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालय