शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

'विकृत मनोवृत्ती ठेचून काढणे गरजेचे'; राहुल सोलापूरकरांच्या विधानावरुन सुनील तटकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:41 IST

Chhatrapati Shivaji Maharaj : मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठं विधान केलं आहे. या विधानावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj : मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठं विधान केलं आहे. या विधानावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले', असा दावा सोलापूरकर यांनी केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले; भारतीयांनीच आणली ही लाजिरवाणी वेळ...

राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर बोलताना सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला. तटकरे यांनी अशी मनोवृत्ती ठेचून काढायला हवी असं म्हणाले. तटकरे म्हणाले,  "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या शौर्याबद्दल राहुल सोलापूरकर नावाच्या विकृत मनोवृत्तीने जे या संबंधात भाष्य केलेले आहे. अशा या विकृत मनोवृत्ती ठेचून काढणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नव्हे तर देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवराय मिर्झाराजे यांच्या आग्रहाखातर दिल्लीला गेले. असा पूर्ण इतिहास पाहतो. ही जी काही मनोवृत्ती आहे, स्वत: कोण किती पात्रतेचे आहे. काय आहेत, तो भाग वेगळा आहे. पण, छत्रपती शिवराय यांच्याबद्दलचे जे काही वक्तव्य केले आहे ते अत्यंत निंदनीय आहे, अशा मनोवृत्ती ठेचून काढणे गरजेचे आहे, अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण इतिहासामध्ये आग्र्याच्या सुटकेला मोठं महत्व आहे. आग्र्यातून सुटकेचा इतिहास आपण अभिमानाने सांगतो.औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं. मात्र महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले आणि परत स्वराज्यात दाखल झाले हा एक मोठा पराक्रमच होता. आग्र्यासह आसपासच्या भागातील ब्राह्मण, साधू-संत व मौलवींना मिठाई व फळे वाटणे, मिठाई व फळांच्या पेटाऱ्यांमध्ये बसून सुटका झाली हे इतिहासात आहे. पण, अभिनेते राहुल सोलापूर यांनी आग्र्याच्या सुटकेबाबत नवीनच दावा केला आहे.

राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केला आहे. आग्र्यातून सुटकेसाठी पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा केला आहे. या विधानामुळे आता नवीन वादंग सुरु झाला आहे. राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस