शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांनी निधी केंद्राकडे परत पाठवल्याचे आयटीसेलचे मॅसेज भाजपवरच उलटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 14:16 IST

खासदाराच्या दाव्यानंतर खुद्द फडणवीसांना समोर यावे लागले. आपण निधी परत पाठविण्याचे काम केले असून या दाव्यांमध्ये तथ्य नाही, असं त्यांनी सांगितले.  एकूणच फडणवीसांच्या 80 तासांच्या कार्यकाळाचे समर्थन करणारे आयटीसेल आणि हेगडे यांचे दावे भाजपवरच उलटल्याची चित्र आहे.

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्या कार्यकाळात फडणवीस केवळ 80 तास मुख्यमंत्रीपदी राहू शकले. राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या आयटी सेलकडून फडणवीसांच्या शपथविधीचं एक भलामोठा मॅसेज व्हायरल करून समर्थन करण्यात आले. मात्र आयटीसेलचा हा प्रचारा भाजपवरच उलटल्याचे चित्र आहे. 

फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच भाजपची आयटी सेल कामाला लागली होती. आयटी सेलच्या माध्यमातून फडणवीसांच्या 80 तासांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचे कौतुक करण्यात आले. राज्यातील मोठमोठ्या प्रकाल्पांच्या 40 हजार कोटी रुपयांच्या निधीचा महाविकास आघाडीचे सरकार गैरवापर करू नये यासाठी फडणवीसांनी तातडीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तसेच या 80 तासांच्या काळात फडणवीसांनी निधी केंद्राकडे परत पाठवला. 

फडणवीसांनी राज्याच्या भल्यासाठी हा निर्णय़ घेतला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन असंही म्हटले होते. हे मॅसेज सोशल मीडियावर फिरत असताना भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी देखील फडणवीसांनी निधी परत पाठवल्याचा दावा केला. त्यानंतर विरोधकांकडून फडणवीसांवर टीका करण्यात आली. राज्यातील जनतेशी ही दगाबाजी असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान खासदाराच्या दाव्यानंतर खुद्द फडणवीसांना समोर यावे लागले. आपण निधी परत पाठविण्याचे काम केले असून या दाव्यांमध्ये तथ्य नाही, असं त्यांनी सांगितले.  एकूणच फडणवीसांच्या 80 तासांच्या कार्यकाळाचे समर्थन करणारे आयटीसेल आणि हेगडे यांचे दावे भाजपवरच उलटल्याची चित्र आहे.