शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कर्जमाफीच्या निर्णायावर एकनाथ खडसे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 16:14 IST

कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे समाधान होणार नसलं तरीही दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. परंतु भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

कर्जमाफीच्या निर्णयावर बोलताना खडसे म्हणाले की, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे उचित नसल्याचे खडसे म्हणाले. मात्र त्याचवेळी खडसेंनी या निर्णयाचं स्वागतही केलं आहे.

या कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे समाधान होणार नसलं तरीही दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे भाजप नेते सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत टीका करत असताना खडसे यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

तसेच याचवेळी बोलताना त्यांनी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट केलं. तसेच भाजपने पाच दिवसात निर्णय घ्यावा अशी कोणतेही मागणी मी पक्षाला केली नाही. मी स्वता: पक्ष चालवलेला आहे त्यामुळे पाच दिवसात कोणताही पक्ष निर्णय घेऊ शकत नाही. असेही खडसे म्हणाले.