शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील खिडक्यांवर लागणार आता लोखंडी ग्रील! ‘शोले स्टाईल’आंदोलनाची परिणती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 20:35 IST

राज्यातील प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील खिडक्यावरील मोकळ्या जागेत आता लवकरच भक्कम लोखंडी ग्रील बसविले जाणार आहेत.

 - जमीर काझी मुंबई : राज्यातील प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील खिडक्यावरील मोकळ्या जागेत आता लवकरच भक्कम लोखंडी ग्रील बसविले जाणार आहेत. मंत्रालयात राज्यभरातून येणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्लूडी) पाठविला आहे.उस्मानाबाद येथील एका तरुण शेतकºयांने दहा दिवसापूर्वी सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून ‘शोले स्टाईल’आंदोलन करीत मंंत्री व अधिकाºयांना घाम फोडला होता. त्या पाश्वभूमीवर खिडक्याच्या वरील जागेत ग्रील बसविणे व चौकटी असलेल्या ठिकाणी दरवाजे तातडीने बसविण्याची सूचना करण्यात आली असल्याचे वरिष्ट अधिकाºयांकडून सांगण्यात आले.२६/११’च्या घटना आणि साडेचार वर्षापूर्वी मंत्रालयात लागलेल्या भीषण आगीच्या पाश्वभूमीवर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आला आहे. मंत्रालयात येणाºया अभ्यगताची तपासणी करण्यासाठी तीनही प्रवेशद्वारावर आधुनिक सामुग्री कार्यरत आहे. तरीही विविध कामानिमित्य मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री, अधिकाºयांना भेटण्यासाठी आलेल्या काहीजणांनी मंत्रालयात आपली कामे न झाल्याच्या कारणास्तव आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. त्यामुळे सत्ताधाºयावर टीका करण्यासाठी विरोधी पक्षाना आयता मुद्दा मिळत असल्याने याबाबी टाळण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाºयांना वेळोवेळी केली आहे.तुळजापूर (जि.उस्मानाबाद) येथील ज्ञानेश्वर साळवे या तरुण शेतकºयाने कर्जमाफी होत नसल्याने १० नोव्हेंबरला मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली होती. कृषीमंत्र्यांची भेट होवू न दिल्यास उडी मारण्याची धमकी देत सुमारे दीड तास पोलीस व प्रशासनााची भंबेरी उडविली. त्यावेळी निरीक्षक संतोष ढेमरे यांनी मोठ्या शिताफीने प्रंसगावधान राखीत साळवेने खाली फेकलेल्या चिठ्ठीवरील नंबरवरुन त्याच्याशी संपर्क साधला. सुमारे २० मिनिटे मोबाईलवरुन संभाषण करीत त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यानच्या काळात राज्यमंत्री रणजित पाटील, दीपक केसरकर शिक्षणमंत्री विनोद तावडे,व अन्य अधिकारी त्याठिकाणी पोहचत समजूत काढीत त्याला सुखरुपपणे खाली उतरविले. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी पुन्हा एकदा आढावा घेतला. मंत्रालयातील खिडक्याच्या वरील जागेत लोखंडी ग्रील व नुसत्या चौकटी असलेल्या ठिकाणी तातडीने दरवाजे बसविण्याची सूचना ‘पीडब्ल्यूडी’ला विभागाला केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिका-याच्या नेतृत्वाखालील सहाय्यक आयुक्त, ९ निरीक्षक,२० उपनिरीक्षकासह सुमारे २०० अंमलदाराचा फौजफाटा कार्यरत आहे. त्यामध्ये ४०वर महिला पोलिसांचा समावेश आहे. मेटल डिटेक्टर,स्कॅनिग मशीनच्या सहाय्याने त्यांच्याकडून अभ्यागताची तपासणी केली जाते. रोज १० हजारावर अभ्यागतमंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी,कर्मचाºयांची संख्या सहा हजारावर असून त्याशिवाय रोज ३ ते ४ हजार अभ्यागत विविध कामासाठी येत असतात. त्याशिवाय मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या दिवशी हे प्रमाण ७,८ हजारापर्यत जाते. त्यामध्ये राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे सरासरी १० ते १४ हजार अभ्यागत मंत्रालयात हजेरी लावित असून त्यांच्यावर देखरेख ठेवताना पोलिसांची तारांबळ उडते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार