शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 4:22 PM

यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मुंबई - यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. पण यामध्ये राज्य शासनाचा काहीही संबंध नाही, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कोणाला उद्घाटक म्हणून निमंत्रण द्यायचे, संमेलनात कोणती सत्र असावीत, कोणाची भाषणे व्हावीत, संमेलनामध्ये कोणती कवी संमेलन व्हावीत आदी सर्व विषय हा साहित्य महामंडळ आणि त्यांच्या समित्या ठरवित असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देणे वगळता यामध्ये शासनाचीही कोणतीही भूमिका नसते आणि संमेलनाच्या कुठल्याही निर्णयामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करत नाही. संमेलनाचे संपूर्ण वेळापत्रक हे आयोजकामार्फत ठरविण्यात येते. त्यामुळे विनाकारण संमेलनाच्या सध्याच्या वादात राज्य सरकारला खेचण्याचा प्रयत्न करु नये, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.  

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उदघाटक म्हणून निमंत्रण देण्याचा आणि नंतर ते परत घेण्यावरुन वाद सध्या सुरु आहेत. यासंदर्भात कालपासून विविध माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. यासंदर्भात राज्य शासनाची भूमिका श्री. तावडे यांनी स्पष्ट केली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन