शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

अमोल पालेकरांची निमंत्रण देऊन मुस्कटदाबी!,सांस्कृतिक धोरणावर टीका केल्याने भाषण थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 06:50 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रख्यात साहित्यिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याचा विषय ताजा असतानाच प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्याबाबतही सांस्कृतिक मुस्कटदाबीचा प्रकार मुंबईच्या नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे घडला.

मुंबई/पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रख्यात साहित्यिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याचा विषय ताजा असतानाच प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्याबाबतही सांस्कृतिक मुस्कटदाबीचा प्रकार मुंबईच्या नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे घडला. सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे पालेकर यांचे भाषण आयोजकांनी मध्येच थांबवले. या प्रकारामुळे सांस्कृतिक क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे.प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टतर्फे शनिवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमोल पालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालेकर यांनी आपल्या भाषणात मुंबई आणि बंगळुरू येथील आधूनिक कला संग्राहलयाच्या सल्लागार समित्या बरखास्त केल्याबद्दल केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाविरूद्ध टिकेचा सूर लावतचा त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला गेला. पालेकरांचे भाषण औचित्यभंग करणारे होते, असा दावा आयोजकांनी केला आहे.या प्रकारावर पालेकर यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मी काही अनाहूत नव्हतो, खास निमंत्रण देऊन मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. कार्यक्रमापूर्वी संयोजकांनी मला काहीही सांगितले नव्हते. पण मी सांस्कृतिक क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या अनिष्ट प्रकाराविषयी बोलत असताना माझे भाषण मध्येच थांबविण्यात आले. मुंबईतील सल्लागार समितीने प्रभाकर बर्वे यांच्यासह एकूण तीन कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याचे ठरविले होते. पण बर्वे सोडून उर्वरित दोघांच्या चित्रांची प्रदर्शने सल्लागार समितीची संमती न घेताच रद्द करण्याचा निर्णय मुंबई कला दालनाच्या संचालिका अनिता रुपवतरम यांनी घेतला. हा निर्णय कसा आणि कशासाठी झाला? हे प्रश्न मला उपस्थित करायचे होते. पण मी बोलत असतानाच कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास बहुलकर यांनी मला मध्येच भाषण थांबविण्यास सांगितले. कलेच्या व्यासपीठावरुन कलेविषयक गोष्टी करायच्या नाहीत तर मग कुठे करायच्या? आणि तसे असेल तर हा एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याावर घाला नव्हे का? असा प्रश्न पालेकर यांनी उपस्थित केला.एनजीएममध्ये घडलेल्या प्र्रकाराबद्दल संध्या गोखले-पालेकर यांनीही खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, पालेकर यांच्या भाषणानंतर ज्येष्ठ कलाकार ललिता लाज्मी, अंजू दोडिया, अमोल दोडिया यांनी त्यांचे कौतुक केले. काही विद्यार्थ्यांनी एकत्र येवून आमच्या भावना पालेकर यांनी व्यक्त केल्याचे सांगितले. या सगळ्या परिस्थितीवरु न वेगळ्या पद्धतीने अंकुश ठेवण्याचे काम सुरु असून यापुढील काळात कलाकार आणि त्यांची कला, याविषयी दिल्लीतील बाबू निर्णय घेणार का, असा सवालही त्यांनी केला.अमोल पालेकर यांचे भाषण औचित्याला धरून नव्हते. या विषयाला राजकीय वळण देणे सर्वस्वी चुकीचे आहे. या कार्यक्रमात नयनतारा सहगल यांच्याविषयी बोलणे योग्य नव्हते, म्हणून मी त्यांना विषयांतर नको एवढेच सांगितले. मी कुणाची मुस्कटदाबी वगैरे केलेली नाही की, कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणलेली नाही.- सुहास बहुलकर,अध्यक्ष, सल्लागार समितीकलेच्या व्यासपीठावरुन कलेविषयी गोष्टी करायच्या नाहीत तर मग कुठे करायच्या? आणि तसे असेल तर हा एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याावर घाला नव्हे का?- अमोल पालेकर

अमोल पालेकर यांच्याबाबतीत घडलेली ही घटना धक्कादायक आहे, पण विरळा नाही. गेली पाच वर्ष मोदी सरकार हेच करत आले आहेत. टीका करणाऱ्यांचे आणि आपल्याहून वेगळी विचारसरणी असणाºयांची तोंडं बंद करण्याचे त्यांचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात.- सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

टॅग्स :Amol Palekarअमोल पालेकरMaharashtraमहाराष्ट्र