शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रामधील गुंतवणूक तिपटीने वाढली - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 20:45 IST

 महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेती शास्वत शेती बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात शेतीक्षेत्रांमधील गुंतवणूक तिपटीने वाढली आहे.

मुंबई -  महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेती शास्वत शेती बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात शेतीक्षेत्रांमधील गुंतवणूक तिपटीने वाढली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे न्यूज 18 लोकमत असे रिलाँचिंग झाले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या वाटचालीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले,"आम्ही शास्वत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राज्यातील बहुतांश क्षेत्र अद्यापही कोरडवाहू आहे. तसेच शेती क्षेत्र हे मदत आणि पुनर्वसनाचे क्षेत्र नाही. त्यात गुंतवणूक व्हायला हवी. ही बाब आम्ही विचारात घेतली आहे. त्यामुळेच शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 2012-13 सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहिल्यास आज शेती क्षेत्रामध्ये सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. शेतीमधील गुंतवणूक ही जवळपास तिप्पटीने वाढली आहे.""महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रामध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 12.50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आकडेवारीत सांगायचे झाले तर शेतीक्षेत्रामधील उत्पन्न 40 हजार कोटींवर पोहोचली आहे. अधिकाधिक शेतीक्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी सिंचनाची सोय वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी एक लाख विहिरी, 50 हजार शेततळी बांधण्यात आली आहेत, शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुमारे 12 लाख हेक्टर जमीन हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे."अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार