शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रामधील गुंतवणूक तिपटीने वाढली - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 20:45 IST

 महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेती शास्वत शेती बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात शेतीक्षेत्रांमधील गुंतवणूक तिपटीने वाढली आहे.

मुंबई -  महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेती शास्वत शेती बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात शेतीक्षेत्रांमधील गुंतवणूक तिपटीने वाढली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे न्यूज 18 लोकमत असे रिलाँचिंग झाले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या वाटचालीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले,"आम्ही शास्वत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राज्यातील बहुतांश क्षेत्र अद्यापही कोरडवाहू आहे. तसेच शेती क्षेत्र हे मदत आणि पुनर्वसनाचे क्षेत्र नाही. त्यात गुंतवणूक व्हायला हवी. ही बाब आम्ही विचारात घेतली आहे. त्यामुळेच शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 2012-13 सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहिल्यास आज शेती क्षेत्रामध्ये सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. शेतीमधील गुंतवणूक ही जवळपास तिप्पटीने वाढली आहे.""महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रामध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 12.50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आकडेवारीत सांगायचे झाले तर शेतीक्षेत्रामधील उत्पन्न 40 हजार कोटींवर पोहोचली आहे. अधिकाधिक शेतीक्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी सिंचनाची सोय वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी एक लाख विहिरी, 50 हजार शेततळी बांधण्यात आली आहेत, शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुमारे 12 लाख हेक्टर जमीन हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे."अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार