शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रामधील गुंतवणूक तिपटीने वाढली - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 20:45 IST

 महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेती शास्वत शेती बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात शेतीक्षेत्रांमधील गुंतवणूक तिपटीने वाढली आहे.

मुंबई -  महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेती शास्वत शेती बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात शेतीक्षेत्रांमधील गुंतवणूक तिपटीने वाढली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे न्यूज 18 लोकमत असे रिलाँचिंग झाले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या वाटचालीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले,"आम्ही शास्वत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राज्यातील बहुतांश क्षेत्र अद्यापही कोरडवाहू आहे. तसेच शेती क्षेत्र हे मदत आणि पुनर्वसनाचे क्षेत्र नाही. त्यात गुंतवणूक व्हायला हवी. ही बाब आम्ही विचारात घेतली आहे. त्यामुळेच शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 2012-13 सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहिल्यास आज शेती क्षेत्रामध्ये सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. शेतीमधील गुंतवणूक ही जवळपास तिप्पटीने वाढली आहे.""महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रामध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 12.50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आकडेवारीत सांगायचे झाले तर शेतीक्षेत्रामधील उत्पन्न 40 हजार कोटींवर पोहोचली आहे. अधिकाधिक शेतीक्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी सिंचनाची सोय वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी एक लाख विहिरी, 50 हजार शेततळी बांधण्यात आली आहेत, शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुमारे 12 लाख हेक्टर जमीन हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे."अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार