शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मुलाखत- संगीत नाटक टिकवायचंच नाही, तर वैभवशाली करायचंय : चिन्मय मोघे ऊर्फ समर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 12:29 IST

नवी पिढी ही संगीत नाटकांकडे फारशी वळत नाही, असा सूर ज्येष्ठ कलाकारांकडून सातत्यानं आळविला जातो. मूळचा नाशिकचा व सध्या स. प. महाविद्यालयात शिकत असलेल्या अठरावर्षीय चिन्मय मोघे ऊर्फ समर यानं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही भूमिकांद्वारे संगीत चंद्रप्रिया हे  नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणत हा समज खोटा ठरविला आहे.

ठळक मुद्देयेत्या २४ मार्च रोजी त्याच्या संगीत चंद्रप्रिया या नाटकाचा तिसरा प्रयोग पुण्यात

येत्या २४ मार्च रोजी त्याच्या संगीत चंद्रप्रिया या नाटकाचा तिसरा प्रयोग पुण्यात होत आहे. त्यानिमित्त त्याच्याशी साधलेला हा संवाद...- नम्रता फडणीस-  

* संगीत चंद्रप्रिया नाटकाचा विषय काय आहे? - हे नाटक चंद्रगुप्ताच्या प्रेमकथेवर आधारित आहे. भारताचा जेव्हा सुवर्णकाळ होता असं म्हटलं जातं, तेव्हा चंद्रगुप्तसारखे जे राज्यकर्ते होते त्यांनी स्त्रियांबाबत काय निर्णय घेतला? हा सुवर्णकाळ पुन्हा आणायचा असेल तर काय करायला हवं, हे सांगितलं आहे. मूळ प्रेमकथा असलेली ही कथा शेवटी स्त्रीवादाचा संदेश देते. चंद्रगुप्त आपल्या बायकोवर वक्रदृष्टी असलेल्या भावाला कसा मृत्युदंड देतो, या सस्पेन्सवर हे नाटक आधारित आहे. तीस ते चाळीस वर्षांनी शास्त्रीय संगीताचा आधार असलेलं संगीत नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. या नाटकात बारा नाट्यपदं आणि भावगीतांचा समावेश आहे. * नाट्यकृतीमधून स्त्रीवादाबद्दल संदेश का द्यावासा वाटला? - प्रत्येक लेखकाची ही जबाबदारी आहे, की त्याच्या कलाकृतीतून कोणता तरी संदेश दिला गेला पाहिजे. नुसत्याच कथेला काही उपयोग नाही. नाटक बघणारा जो वर्ग आहे. त्यांच्यापर्यंत कलाकृतीच्या माध्यमातून काहीतरी पोहोचविणे गरजेचं आहे. स्त्रियांच्या बाबतीत भीषण गोष्टी घडत आहेत. त्याबाबत काय उपाययोजना करायला हव्यात, हे माज्या हातात असलेल्या नाट्यकलेतून मी मांडलं आहे. कारण मला केवळ प्रेमकथा मांडायची नव्हती. * अनेक ऐतिहासिक कथा आहेत; मग हीच सत्यकथा का निवडलीस? - आपल्याकडे अनेक नाटके रामायण किंवा महाभारतावरच अधिक झाली. अगदीच संगीत मानापमानसारखी नाटकं दीडशे वर्षांपूवीर्चं चित्रण घडवतात. मध्यंतरीचा देखील कालखंड आहे; मात्र त्याची फारशी दखल घेतली गेलेली नाही. उदा: चंद्रगुप्तच्या काळात नक्की काय झालं? हे फारसं कुणालाच माहिती नाही. ते प्रकाशात आणावंसं वाटलं म्हणून ही सत्यकथा निवडली. * संगीत नाटकच का करावंसं वाटलं? - संगीत नाटकांना दीडशे वर्षांचा इतिहास आहे. इतकी वैभवशाली परंपरा केवळ काही कारणांमुळे अथवा महत्त्वाकांक्षेच्या अभावामुळे मागे पडल्याचं दिसलं. चाळीस ते पन्नास वर्षांचा कालखंड पाहिला तर नवनिर्मिती थांबल्याचं जाणवलं.मत्स्यगंधा किंवा कट्यार काळजात घुसली ही शेवटची संगीत नाटके ठरली. त्यानंतरची नाटकं ही लावणी किंवा नृत्यनाट्याच्या जवळ जाणारी होती. मूळ संगीत नाटकाच्या परंपरेला अनुसरून नाटकं लिहावीत असं वाटलं. नवीन नाट्यपद, कथा मांडाव्यात असा विचार आला. * तुला संगीताची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभली आहे का? - नाही. चाळीस-पन्नास वेगवेगळ्या गटातील संगीत नाटकं पाहूनच शिकलो. रसिकांनी माझं नाटक पाहून प्रतिक्रिया द्यावी. * संगीत नाटकाच्या भवितव्याविषयी ज्येष्ठ कलाकारांकडून चिंता व्यक्त केली जाते? त्याविषयी तुझे मत काय?- मी मूळचा नाशिकचा आहे. वर्षभरापूर्वी नाटकासाठी पुण्यात आलो. पण मला नाटकांविषयीची महत्त्वाकांक्षा जाणवली नाही. केवळ हळहळ व्यक्त होत राहिली. आता पुन्हा संगीत नाटकं रंगभूमीवर येत आहेत. त्यामुळे नुसतीच हळहळ व्यक्त न करता त्याला प्रोत्साहन द्यायचीदेखील जबाबदारी आहे. महत्त्वाकांक्षा ठेवली तर परंपरा द्विगुणित होते. * आगामी लेखन कोणतं सुरू आहे? - सध्या पुढच्या नाटकाचं लेखन सुरू आहे. दुसरं गद्यनाटक वर्षाअखेर येईल.  प्रेमगंध या काल्पनिक कथेवर आधारित कादंबरीच्या लेखनाचं काम पूर्ण झालं आहे. महाकाव्य शिवप्रताप हा माझा ग्रंथ चार महिन्यांत पूर्ण होईल. हे मराठी भाषेतील पहिलं महाकाव्य असेल. --------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकmusicसंगीतinterviewमुलाखत